Skip to main content

भ्रष्टाचार विरोधी जनजागृती राष्ट्रमंचच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विजयभाऊ सुभाषशेठ कांबळे यांची निवड

 भ्रष्टाचार विरोधी जनजागृती राष्ट्रमंचच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विजयभाऊ सुभाषशेठ कांबळे यांची निवड 


(इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख)

भ्रष्टाचार विरोधी जनजागृती राष्ट्रमंचच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विजयभाऊ सुभाषशेठ कांबळे यांची निवड सर्वानुमते  करण्यात आली.

इंदापूर ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी जनजागृती राष्ट्रमंचच्या कार्यालयात झालेल्या मीटिंगमध्ये   विजय भाऊ सुभाष शेठ कांबळे यांची निवड संस्थापक प्रदेशाध्यक्ष पत्रकार जावेद शेख यांच्या हस्ते करण्यात आली.

शासन प्रशासनामध्ये भ्रष्टाचाराची लागलेली कीड संपूर्णपणे समूळ  पूर्णपणे नष्ट करण्यासाठी मी भ्रष्टाचार विरोधी जनजागृती राष्ट्रमंचच्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करेल व माझ्या हातून जे काही नागरिकांचे व जनतेची निस्वार्थ सेवा करता येईल ती मी करण्याचा प्रयत्न करीन व विना लाच विना भ्रष्टाचार या मार्गाचा अवलंब करून शासन प्रशासन दरबारी असलेली नागरिकांची कामे मी मार्गी लावण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर कांबळे यांनी सांगितले.  


 जे अधिकारी खरेच भ्रष्ट कारभार करतात त्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी पुढे येऊन लाचलुचपत  प्रतिबंधक  कार्यालयाशी संपर्क साधून भ्रष्ट कारभाराचा समूळ  नष्ट करण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजे असेही निवडीनंतर  कांबळे यांनी सांगितले.

 पुढे ते असेही म्हणाले महाराष्ट्रात कोठेही एखाद्या शासकीय कार्यातलयात  अधिकारी   पैशाची मागणी करीत असेल तर नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही संबंधित त्या जिल्ह्यातील  लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी अथवा त्या लाचलुचपत प्रतिबंधक  अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी व सामान्य नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी एक दुवा म्हणून नागरिकांना मदत करू असेही कांबळे यांनी सांगितले.

  विजयभाऊ कांबळे इंदापूर शहरातील  कांबळे कावड सोहळा चे प्रमुख विश्वस्त असून इंदापूर शहरात कांबळे कावड सोहळा महाराष्ट्रात एक नावलौकिक असलेली व उत्साहाने पार पाडणारी कावड सोहळा म्हणून महाराष्ट्राला परिचित असून काही दिवसापूर्वीच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अशी भुत्या तेल्याची कावडीने या कांबळे कावड सोहळ्याला  भेट दिलेली होती .

या भेटीसाठी कांबळे यांनी विशेष प्रयत्न केले होते . कांबळे हे शिवराज्य शेतकरी विकास मंचचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष असून त्याचप्रमाणे ते हिंदू खटीक समाज  संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही काम करीत आहे. कांबळे यांच्या घराला स्वतंत्र सैनिक यांचा वारसा लाभलेला आहे.

 भ्रष्टाचार विरोधी जनजागृती राष्ट्रमंच मध्ये  महाराष्ट्र राज्यात  काम करण्यासाठी  या 9881412930 ,9561222930  मोबाईल  भ्रमणध्वनी वर संपर्क   साधावा असेही  विजय भाऊ कांबळे यांनी सांगितले. 

 भ्रष्टाचार विरोधी जनजागृती राष्ट्रमंच मंच चे संस्थापक प्रदेशाध्यक्ष जावेदभाई शेख यांनी यावेळी विजय भाऊ कांबळे यांना निवडीचे पत्र दिले. यावेळी संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष गुणवंत हनुमंत दळवी,अलीअकबर मणेरी, महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष वर्षा रंणजीत राऊत तसेच सामाजिक कार्यकर्ते तय्यब तांबोळी हे यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

इंदापूर नगरपरिषद निवडणूक : काँग्रेसकडून प्रभाग सात मधून नगरसेवक उमेदवारी साठी मोहम्मद रफी सय्यद प्रबळ दावेदार उमेदवार

 इंदापूर नगरपरिषद निवडणूक : काँग्रेसकडून प्रभाग सात मधून नगरसेवक उमेदवारी साठी मोहम्मद रफी सय्यद प्रबळ दावेदार उमेदवार  इंदापूर नगरपरिषद निवडणूक : काँग्रेसकडून प्रभाग सात मधून नगरसेवक उमेदवारी साठी मोहम्मद रफी सय्यद प्रबळ दावेदार उमेदवार  इंदापूर – इंदापूर नगरपरिषद निवडणुकीचे वेळापत्रक आज निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर व्यंकटेश नगर येथील रहिवासी तसेच काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक शहराध्यक्ष मोहम्मद रफी सय्यद यांनी प्रभाग क्रमांक ७ (ब) मधून सर्वसाधारण पुरुष या गटातून निवडणूक लढण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षाने त्यांना तिकीट दिल्यास सय्यद हे उमेदवार जनतेच्या विश्वासाचे सोने करून दाखवतील, असा ठाम विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे. शहरातील विविध भागात त्यांचा वाढता जनसंपर्क, सर्व समाजघटकांशी सुसंवाद आणि अल्पावधीत उभे केलेले सामाजिक कार्य यामुळे त्यांची प्रतिमा जनतेच्या मनात दृढ झाली आहे. शहरात स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, तसेच युवकांच्या विकासाशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा...

दफ्तर दिरंगाई कायदा, 2006

 दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दं...

फलटण तालुक्यातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या व तालुका कोर्टाची अद्यावत स्वरूपाची सर्व समावेशक इमारत उभारणेबाबतची मागणी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे.*

 *फलटण तालुक्यातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या व तालुका कोर्टाची अद्यावत स्वरूपाची सर्व समावेशक इमारत उभारणेबाबतची मागणी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे.* (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख ) फलटण, जिल्हा सातारा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली त्यासाठी प्रथम आपल्या सर्वांचे आभार. सध्याचे तालुका कोर्ट हे फलटण येथे विमानतळा नजीक आहे. तिथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी लागणारी जागा मुबलक प्रमाणात नाही. कारण - या ठिकाणी विमानतळ नजीक असले कारणाने या इमारतीवर मजले वर चढविता येत नाहीत व ही जागा ही तशी अपुरी /कमी आहे. सध्या फलटणमध्ये एकूण ७ बेंच आहेत (मा.न्यायाधीश साहेब आहेत). त्यांना बसण्यासाठी एका ठिकाणी पुरेशी जागा नसल्यामुळे ४ बेंच फलटण कोर्टाच्या इमारतीत तर बाकी ३ बेंच हे तहसील कार्यालयाच्या वरती आहेत. या दोन्ही कोर्टांच्या ठिकाणांमधील अंतर हे साधारण 300 मीटर पेक्षा जास्तच आहे. त्यामुळे सर्वच नागरिक/ पक्षकारांची व वकिलांची तारांबळ उडते. जामीनाचा अर्ज एका ठिकाणी तर त्याची पूर्तता ही दुसऱ्या ठिकाणी ही कोणती न्यायदानाची पद्धत? ज...