Skip to main content

Posts

Showing posts from April, 2024

पुण्यातून लोकसभेसाठी एम आय एम पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर.

  पुण्यातून लोकसभेसाठी एम आय एम पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर. गेल्या पंचवीस वर्ष पुण्यातील राजकारणात सक्रिय असलेले. अनिस सुंडके एमआयएम पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात. अनिस सुंडके नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, लहान भाऊ रईस सूंडके नगरसेवक, तर अनिस सुंडके यांची पत्नी हमिदा सुंडके पुणे मनपा 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आल्या होत्या.  गेल्या पंचवीस वर्षापासून पुणे येथील राजकारणात सक्रीय असलेले अनिस सुंडके यांची आज 16/04/2024 रोजी औरंगाबाद येथे ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुदुल मुस्लिमिन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची निवडणूक प्रचारासाठी आले होते. याच दरम्यान झालेल्या जाहीर सभेत पुणे लोकसभा मतदारसंघ येथून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. याप्रसंगी एम आय एम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील कार्याध्यक्ष अब्दुल गफार कादरी औरंगाबाद व पुणे येथील अनेक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते.  खासदार ओवेसी यांनी सांगितले की आम्ही पुण्याच्या निवडणुकीमध्ये ताकत...

माणसाला माणुस म्हणून जगण्याचा अधिकार फक्त बाबासाहेबांमुळे मिळाला* *आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडून महामानवाला अभिवादन...*

 *माणसाला माणुस म्हणून जगण्याचा अधिकार फक्त बाबासाहेबांमुळे मिळाला*  *आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडून महामानवाला अभिवादन...* (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख ) हजारो वर्ष गुलामगिरीत खितपत पडलेल्या दिन दुबळ्या समाजाला गुलामीच्या शोषणातून बाहेर काढून त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाला असल्याचे गौरवोद्गार आमदार दत्तात्रय भरणे यांनी काढले. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त आज इंदापुर शहरामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आयोजित जयंती निमित्त आमदार दत्तात्रय भरणे महामानवास अभिवादन केले. याप्रसंगी बोलताना आ.भरणे म्हणाले की,आज परमपुज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण जग त्यांना स्मरण करतोय.खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य हे पीडित, शोषित,दलित,आदिवासी समाजाला आपले न्याय हक्क मिळवून देण्यासाठी खर्च केले असून त्यांच्यामुळेच आज प्रत्येकाला समानतेचा तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला आहे.तसेच सामाजिक विषमतेच्या विरोधात त्यांनी प्रचंड मोठा संघर्ष उभा करून आपल्...

शाजीया व अर्सलान नासेर अत्तार आनी साकीब शाकेर अत्तार या तीनही चीमुकल्यानी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा केला पूर्ण.*

 *शाजीया  व अर्सलान नासेर अत्तार आनी साकीब शाकेर अत्तार या तीनही चीमुकल्यानी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा केला पूर्ण.* बीड (प्रतिनिधी): इस्लाम धर्मामध्ये रमजान  महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात सर्व मुस्लिमांसाठी नमाज पढने व उपवास करणे हे अनिवार्य आहे, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत या महिन्यात उपवास ठेवतात घरात आई- वडिलांना पाहून मुलां मध्ये ही उपवास ठेवण्याची इच्छा जागृत होऊन. त्यात लहान मुले आणि लहान मुली मोठ्यांचे अनुकरण करतात आणि उपवास करतात. त्याचप्रमाणे बिड शहरातील शाहझीया नासेर अत्तार ही १० वर्ष  अर्सलान नासेर अत्तार ( ८  ) साकीब शाकेर अत्तार वय ७ व्या यां तीनही वयाचे बालीकेने पहीला रोजा इतक्या उन्हाच्या कडक तापमानात शुक्रवार, ( ५‌ )अप्रैल रोजी पवित्र रमजान (५  अप्रैल) रोजी अन्न किंवा पाण्याचा थेंबही न घेता आयुष्यातील पहिला रोजा उपवास काटेकोरपणे पूर्ण केला. आपल्या आल्लाह साठी रमजान मधील उपवास केला उन्हाळ्यात एकही पाण्याचा थेंब आणि आन्नाचा कन किंवा थूकी सुद्धा न गिळता रोजा पूर्ण केल्यामुळे  त्यांचे मामा अत्तार वेलफेअर ट्रस्ट चे जनरल सेक्र...

शिवराज्य शेतकरी विकास मंचचे महाराष्ट्र राज्यातील कार्य कौतुकास्पद - आरपीआय नेते शिवाजीराव मखरे

 शिवराज्य शेतकरी  विकास मंचचे महाराष्ट्र राज्यातील  कार्य कौतुकास्पद - आरपीआय नेते शिवाजीराव मखरे (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख) शिवराज्य शेतकरी विकास मंचचे  महाराष्ट्रातील कार्य कौतुकास्पद असून शिवराज्य शेतकरी विकास मंच चे  महाराष्ट्रात एक सामाजिक कार्याचा ठसा उमटवलेला आहे असे आरपीआय नेते शिवाजीराव मखरे यांनी शिवराज्य शेतकरी विकास मंच ने  बुधवारी इंदापूर शहरात आयोजित केलेल्या रोजा इफ्तार पार्टीत उद्गार काढले. शिवराज्य शेतकरी विकास मंच गेले तीन वर्षापासून रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करत असल्याचेही आरपीआय नेते शिवाजीराव मखरे यांनी  असे सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातच देशाला एकसंध व एकत्र ठेवण्याची शिकवण दिलेली आहे असेही  आरपीआय नेते शिवाजीराव मखरे यांनी सांगितले. शिवराज्य शेतकरी विकास मंच ने  असेच कार्य चालू ठेवल्यास या वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही असे त्यांनी  यावेळी सांगितले.            इंदापूर शहरातील  मस्जिद चे मौलाना तसेच शहरातील प्रतिष्ठित, नाम...

*श्री क्षेत्र नीरा नरसिंहपुर(ता. इंदापूर) श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरातून* महायुतीच्या *बारामती लोकसभा* मतदारसंघाच्या *उमेदवार मा सौ सुनेत्रावहिनी अजितदादा पवार* यांच्या *प्रचाराचा शुभारंभ कार्यक्रम* व *घोंगडी बैठक आमदार श्री यशवंत (तात्या)माने* यांच्या *हस्ते व अध्यक्षतेखाली पार पडली.*

 *श्री क्षेत्र नीरा नरसिंहपुर(ता. इंदापूर) श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरातून*  महायुतीच्या *बारामती लोकसभा* मतदारसंघाच्या *उमेदवार मा सौ सुनेत्रावहिनी अजितदादा पवार* यांच्या *प्रचाराचा शुभारंभ कार्यक्रम* व *घोंगडी बैठक आमदार श्री यशवंत (तात्या)माने* यांच्या *हस्ते व अध्यक्षतेखाली पार पडली.*  याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे,पंचायत समिती माजी सभापती प्रशांत पाटील,श्रीमंत ढोले,बापूराव शेंडे,अतुल झगडे,दत्तात्रय मामा घोगरे,सतीश पांढरे,शिवाजी तरंगे, शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब काळे,संग्रामसिंह पाटील,श्रीकांत बोडके,दशरथ राऊत,जगदीश सुतार,गौरव दंडवते,नितीन सरवदे,चंद्रकांत सरवदे,विठ्ठल देशमुख,शंकर राऊत सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
 *श्री खलील खान सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव यांना करमाळा पंचायत समिती मार्फत आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित*  आदरणीय गुरुवर्य खान सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव येथील विषय शिक्षक यांना करमाळा पंचायत समितीच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले गटविकास अधिकारी मनोज राऊत साहेब यांच्या हस्ते फेटा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले पुरस्कार मिळाल्याने आपले मनःपूर्वक अभिनंदन आपण आपल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या ज्ञानाची ही पावती आहे.आणी आपल्या गावाचे नाव सुद्धा उंचावले खरोखरच अतिशय आनंद होत आहे की आपण शाळेचा देखील आपल्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने कायापालट आपण केलेला आहे‌. आपला आम्हाला आणि ग्रामस्थांना सार्थ अभिमान आहे.आपण असेच मार्गदर्शन करत राहाल. निवडी बद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे तसेच घारगावच्या माजी सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे सामाजिक कार्यकर्ते संजय सरवदे यांनी देखील या निवडीबद्दल त्याचे भरभरून  कौतुक केले व पुढील भावी वाटचालीस खूप शुभेच्छा दिल्या तसेच ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनं...