Skip to main content

Posts

Showing posts from February, 2023

राष्ट्रीय समाज पार्टी व जनता दल (सेक्युलर ) व मित्र पक्षाच्या वतीने कांद्याला हमी भाव मिळावा, शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी वीज बील माफ करावे, विज तोड थांबवावे शेतीमालाला आधारभूत किंमत मिळावी यासह शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन

 राष्ट्रीय समाज पार्टी व जनता दल (सेक्युलर ) व मित्र पक्षाच्या वतीने  कांद्याला हमी भाव मिळावा, शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी वीज बील माफ करावे, विज तोड थांबवावे शेतीमालाला आधारभूत किंमत मिळावी यासह शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन शिरूर :   कांद्याला हमी भाव मिळावा, शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी वीज बील माफ करावे, विज तोड थांबवावे शेतीमालाला आधारभूत किंमत मिळावी यासह शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांच्या मागणीसाठी  राष्ट्रीय समाज पार्टी व जनता दल (सेक्युलर ) व मित्र पक्षाच्या वतीने  पुणे नगर महामार्गावर शिरूर जवळ न्हावरेफाटा येथे केंद्रर शासन व महाराष्ट्र शासन यांचा निषेध करत महामार्गावर कांदे टाकून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिरूर  नायब तहसीलदार महेश काळेगावकर यांना निवेदन देण्यात आले.   यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे ,तालुका अध्यक्ष शिवाजी कु-हाडे, जिल्हा संघटक तान्हाजी शिंगाडे,जनता दल  जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, शिवाजी खेडकर, रासपा नेते रामकृष्ण बिडगर, शिरूर -आबेगाव विधानसभा अध्यक्ष किरण श...

कांदा, कापूस आणि द्राक्ष उत्पादकांसाठी महाविकास आघाडीचा शिंदे -फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल. आमदार दत्तात्रय भरणे यांचा सहभाग...

 कांदा, कापूस आणि द्राक्ष उत्पादकांसाठी महाविकास आघाडीचा शिंदे -फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल. आमदार दत्तात्रय भरणे यांचा सहभाग... (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख ) 'सरकार प्रचारात व्यस्त', 'कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त',  'शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो', 'कांद्याला भाव मिळालाच पाहिजे', 'कापसाला भाव मिळालाच पाहिजे', 'हरभऱ्याला भाव मिळालाच पाहिजे', 'दोन रुपयाचा चेक देणार्‍या सरकारचा निषेध असो', 'शेतकऱ्यांची चेष्टा करणार्‍या सरकारचा निषेध असो', 'गद्दार सरकार जोमात...शेतकरी मात्र कोमात', 'कांदा, कापसाने रडवलं सरकारने कमावलं' अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे - फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  राज्यातील कांदा उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून न्याय मिळत नसल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी कांदा आणि कापसाच्या माळा घालून महाविकास आघाडीचे आमदार शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सरकारने कापसासाठी निर्यात धोरण त...

रुग्ण हक्क परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी आनंद आरकल*

 *रुग्ण हक्क परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी आनंद आरकल* सोलापूर - डॉक्टरांचे संरक्षण आणि रुग्णांचे न्याय हक्कासाठी लढणारी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयएसओ मानांकित आशिया खंडातील पहिली संघटना रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश होय. या संघटनेच्या  महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सोलापूर येथील आनंद आरकल यांची आज निवड करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिले.           आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील हजारो रुग्णांचे लाखो रुपयांचे बिल माफ करण्यासोबतच, फौजदारी संहितेचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा व औषध सुरक्षा कायदा झाला पाहिजे यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांचे नेतृत्वाखाली रुग्ण हक्क परिषद सक्रिय आंदोलन उभे करत आहे.                 

*16 व्या शतकात प्रतिकूल काळातही शिवाजी महाराज यशस्वी राज्यकर्ते होते - उमेश चव्हाण*

 *16 व्या शतकात प्रतिकूल काळातही शिवाजी महाराज यशस्वी राज्यकर्ते होते - उमेश चव्हाण* *पुणे -* सतत होणाऱ्या लढाया, जाचक 'कर' वसुली, स्त्री्यांच्या अब्रूची हेळसांड, उध्वस्त झालेला उद्योग व्यापार, शेतीची झालेली दुरावस्था, नागरिकांच्या मनात पसरलेल्या भीतीने पुण्यासह राज्यातील अनेक शहरे उध्वस्त झालेली होती. अशावेळी माता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी इथल्या जनतेला अभय दिले. गाढवाचा नांगर फिरवलेल्या शेतीत सोन्याचा नांगर फिरवला. शेतकऱ्यांच्या शेतीची काळजी घेतली. आयबायांच्या अब्रूला धक्का लावला तर प्राणदंडाची शिक्षा दिली. दुष्काळात काहीच पिकले नाही तर संपूर्ण शेतसारा 'माफ' केला. जनतेला सुरक्षित ठेवले. जनतेच्या हिताचे निर्णयाची फक्त सवंग घोषणाबाजीच नव्हे तर काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यामुळेच शिवाजी महाराज गेली 400 वर्षे जनतेच्या हृदयात जिवंत आहेत, जोपर्यंत पृथ्वी अस्तित्वात राहील, तोपर्यंत त्यांची जयंती उत्साहात साजरी केली जाईल, कारण प्रतिकूल काळातही शिवाजी महाराज हे यशस्वी राज्यकर्ते होते, असे मत रुग्ण हक्क परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त...

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास युवकांनी वाचावा-आमदार दत्तात्रय भरणे*

 *छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास युवकांनी वाचावा-आमदार दत्तात्रय भरणे* युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज राजे शूरवीर होते, दानशूर होते, न्यायी होते. महान, पराक्रमी राज्यांची परंपरा आपल्याला लाभली असली तरी रयतेचा राजा असं म्हटलं की समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं कुठलं नाव येत नाही. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची  जयंती  आपण उत्साहाने साजरी करतो. यानिमित्त महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची अनमोल वैशिष्ट्ये जाणून घेतली पाहिजे , ज्यामुळे  खऱ्या अर्थाने रयतेचा राजा नव्या पिढीला समजेल... छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा युवकांनी जरूर घ्यावा  .महाराजांचे संघटन कौशल्य,सामाजिक सलोखा ,दूरदृष्टी अशा अनेक पैलू महाराजांचे घेण्यासारखे होते असे आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले यावेळी जयंती निमित्त विविध कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .

इंदापुर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर,लोकमान्य नगर यांच्या सयुंक्त विद्यमानाने छञपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 इंदापुर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर,लोकमान्य नगर यांच्या सयुंक्त विद्यमानाने छञपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला इंदापुर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर,लोकमान्य नगर यांच्या सयुंक्त विद्यमानाने छञपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  ( इंदापूर प्रतिनिधी ) सुरूवातीला महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आदरणीय,दत्तात्रय(मामा)भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष मा.श्री.प्रदीपदादा गारटकर आणि पुणे जिल्हा परिषद मा.आरोग्य सभापती मा.श्री.प्रविणभैया माने यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्याच बरोबर इतर मान्यवरांच्या हस्ते सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी मा.नगराध्यक्ष विठ्ठल(आप्पा)ननवरे,मा.नगराध्यक्ष सुरेश नाना गवळी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,नगरसेवक अनिकेत दादा वाघ,प्रा.अशोक मखरे,मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे,आर.पी.आय.तालुकाध्यक्ष,बाळासाहेब...

संभाजी चौक ते श्रीराम चौक रस्त्यावर अनेक जीवघेणे खड्डे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे

 संभाजी चौक ते श्रीराम चौक रस्त्यावर अनेक जीवघेणे  खड्डे  खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख) इंदापूर शहरातील नगरपालिके च्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेले असून संभाजी चौक ते श्रीराम चौक या रस्त्यावरील अनेक ठिकाणी रस्त्यांना खड्ड्यांचे स्वरूप आले असून या खड्ड्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाजी चौक च्या पुढे एक भला मोठा खड्डा रस्त्यावर पडलेला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत असून या ठिकाणी रात्री अनेक किरकोळ अपघात झालेले असून यामध्ये अनेक जणांना किरकोळ जखमसह गाडीचे नुकसान झालेले आहे. इंदापूर नगरपरिषद या खड्ड्यामध्ये एखादा मोठा अपघात होऊन एखाद्या निष्पाप व्यक्तीचे जीव गेल्यावर हा खड्डा बुजवणारा आहे का असेही नागरिक बोलत आहे याप्रकरणी इंदापूर नगर परिषदेचे बांधकाम अधिकारी रविराज राऊत यांना संपर्क साधला असता त्यांनी कॉल रिसीव करण्यास नकार दिला. रविराज राऊत हे बिनकामाचे अधिकारी असल्याचेही नागरिक सांगत आहे कारण रविराज राऊत  हे मनमानी हुकूमशाही पद्धतीने  हम करो सो कायदा या पद्धतीने कामकाज करत आहे.  त...

सोलापूरा जिल्हा अध्यक्षापदी सौ.निलम बनसोडे, तर माळशिरस तालुका अध्यक्षा पदी सौ.सारीका पाटील यांची निवड

 सोलापूरा जिल्हा अध्यक्षापदी सौ.निलम बनसोडे, तर माळशिरस तालुका अध्यक्षा पदी सौ.सारीका पाटील यांची निवड  (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख) शिवराज्य शेतकरी विकास मंच सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी सौ.नीलम बनसोडे यांची निवड करण्यात आली तर माळशिरस तालुका अध्यक्षपदी सौ.सारिका पाटील यांची निवड करण्यात आली. धर्मपुरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी झालेल्या मीटिंगमध्ये शिवराज्य शेतकरी विकास मंचा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा वर्षाताई रणजीत राऊत यांनी सौ.निलम बनसोडे  यांना   सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवडीचे पत्र दिले व सौ.सारीका पाटील यांना माळशिरस तालुका अध्यक्षा पदी निवडीचे पत्र दिले.  यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष संध्याराणी राऊत सह सोलापूर जिल्ह्याचे अनेक महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या. सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निलंब बनसोडे यांची निवड झाल्यानंतर निवडल्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यात शिवराज्य शेतकरी विकास मंच मंचा विस्तार करणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितले तर माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड झालेल्या सारिका पाटील यांनी महाराष्ट्र तालुक्यात गाव तिथे शिवराज्य शे...

मुस्लिम बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार* *आमदार दत्तात्रय भरणे*

 *मुस्लिम बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार* *आमदार दत्तात्रय भरणे* (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख ) रविवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी लुमेवाडी तालुका इंदापूर येथील सुमारे 4 कोटी 50 लाख निधीच्या कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी अंतर्गत रस्ते सभा मंडप अंतर्गत गटर लाईन तसेच जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या दोन कोटी चाळीस लाख निधीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी आमदार दत्तात्रय भरणे बोलत होते आमदार दत्तात्रय म्हणाले की इंदापूर तालुक्यातील हिंदू मुस्लिम भाई भाई असल्याचे पहिल्यापासून इंदापूर तालुक्यातील पाहिले आहे तसेच ते टिकवले पण आहे परंतु सध्याच्या काळामध्ये काही धर्म विरोधी राजकीय पक्ष चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालून धर्म धर्मामध्ये वितूष्ट आणण्याचे काम चोरीछुपे करत आहेत या मंडळींना वेळी त्यांची जागा दाखवत खड्यासारखे बाजूला काढावे असे आवाहन यावेळी भरणे यांनी केले तालुक्यामध्ये विकासाची काम तर होत राहतील परंतु सामाजिक सलोखा राखण्याचे काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच केले आहे तालुक्यामध्ये रस्ते असतील ...

फौजदारी संहितेचा रुग्ण अधिकार कायदा झाला पाहिजे, हेच रुग्ण हक्क चळवळीचे उद्दिष्ट - उमेश चव्हाण

 *फौजदारी संहितेचा रुग्ण अधिकार कायदा झाला पाहिजे, हेच रुग्ण हक्क चळवळीचे उद्दिष्ट - उमेश चव्हाण * (इंदापूर प्नतिनिधी जावेद शेख)   अनेक धर्मदाय व खाजगी रुग्णालयांमध्ये आमच्याकडे कोणत्याही शासकीय योजना नाहीत, तुम्ही स्वतःचेच पैसे भरा. असे ठामपणे खोटे बोलून रुग्ण कर्जबाजारी कसा होईल आणि हॉस्पिटल मालामाल कसे होईल, असेच धोरण सर्रासपणे आढळते. यासाठी फौजदारी संहितेचा रुग्ण अधिकार कायदा होणे, ही काळाची गरज आहे, असे मत रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केले. रुग्णांचे हक्क व अधिकार या विषयावर ते आज बोलत होते.         प्रत्येक रुग्णालयामध्ये बिल कसे आकारले जाते? याचे दर पत्रक लावणे बंधनकारक आहे. प्रत्येक धर्मादाय रुग्णालयांच्या नामफलकावर धर्मादाय रुग्णालय आहे, असा उल्लेख करणे बंधनकारक आहे. प्रत्येक रुग्णालयाच्या दर्शनी बाजूस रुग्णांचे हक्क व अधिकाराची सनद लावणे बंधनकारक आहे. या सर्व महत्त्वाच्या संवेदनशील गोष्टींसाठी रुग्ण हक्क परिषदेने आंदोलन केली, म्हणूनच या रुग्ण हक्क परिषदेच्या आंदोलनांना यश मिळाले व या सर्व गोष्टी बंधनकारक झाल्याचे रुग्ण...

हर्षवर्धन पाटील जरा लाजा, बिले द्या नाहीतर तुमच्या निवास स्थानासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार -श्री.निवास शेळके

 हर्षवर्धन पाटील जरा लाजा, बिले द्या नाहीतर तुमच्या  निवास स्थानासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार -श्री.निवास शेळके  इंदापूर: शेतकऱ्यांची पिळवणूक न करता तात्काळ थकीत उसाची बिले (पैसे) दिनांक ०६/०२/२०२३ पूर्वी शेतकन्यांच्या खात्यात जमा करा. अन्यथा दिनांक ०७/०२/२०२३ रोजी कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील यांचे निवास स्थानासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार आसल्याचे निवेदन कार्यकारी संचालक कर्मयोगी कारखान्यावर देण्यात आले, आसल्याची माहीती निवास सखाराम शेळके,उपाध्यक्ष, इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी सदस्य. इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षण सुधार समिती मु.पो. बनकरवाडी (करेवाडी) ता. इंदापूर,  कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याने ऑक्टोबर ते आज अखेर साडे सात लाख टनाचे आसपास उसाचे गाळप केले असून या कारखान्यांचे चेअमन, संचालक, कार्यकारी संचालक यांनी आज पर्यंत शेतकन्यांच्या खाल्यावर एक ही दमडीही जमा केली नाही. केवळ राजकारण म्हणूण शेतकल्यांच्या प्रपंचाशी खेळ खेळत शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणले जात आहे ते अशोभनीय आहे. शेतकऱ्यांचा प्रपंचा हा शेतीवर अवलंबून असतो हैं सर्व जात असताना मुद्दाम...

वीज कंपनीची मागणी प्रति युनिट रक्कम वाढविण्याच्या प्रस्तावावर आक्षेपाबाबतची कुमारी कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केलीमागणी

 *वीज कंपनीची मागणी प्रति युनिट रक्कम वाढविण्याच्या प्रस्तावावर आक्षेपाबाबतची  कुमारी कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केलीमागणी  (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख ) महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नागरिकांकडून दिनांक 15 2 23 पर्यंत सूचना मागविल्या आहेत. परंतु या सूचनांचा काही उपयोग होईल असे मला वाटत नाही, म्हणून काही प्रश्न वरील सर्व मान्यवरांना विचारते ते पुढील प्रमाणे-भारतीय संविधानाने देशातील सर्व नागरिकांना समान अधिकार, हक्क व न्याय मिळण्याची हमी दिली आहे. मग दिल्ली व पंजाब या राज्यातील नागरिकांना 100 ते 200 युनिट पर्यंत झिरो बिल तर बाकीच्या राज्यांतील नागरिकांवर अनेक प्रकारच्या आकारांचे/करांचे ओझे का? त्या दोन राज्यांसारखे भारतातील बाकीच्या राज्यातील लोकांना झिरो बिल का होऊ शकत नाही? वीज वितरण कंपनीचे सर्व कामकाजाचे ओझे सामान्य नागरिक, लघुउद्योग करणारे व शेतकऱ्यांच्या अंगावर का? विविध आकार/करांच्या नावाखाली नागरिकांची पिळवणूक चालली आहे. उदाहरणार्थ वीज बिला मधील स्थिर आकार सण 2011 मध्ये 40 रुपये होता तो आत्ता 105 रुपये झाला तसेच लघु उद्योगाच्या वीज बिलात 190 वरून तो 427...