Skip to main content

Posts

Showing posts from August, 2022

१० वी,१२ वी परिक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अलमिजानच्यावतीने सत्कार

 १० वी,१२ वी परिक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अलमिजानच्यावतीने सत्कार  श्रीरामपुर (शौकतभाई शेख) : येथील अलमिजान एजुकेशन ऍंड वेल्फेअर सोसायटीच्यावतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह पालक मेळाव्यात पुष्प गुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष हाजी याक़ूब भाई कुरेशी होते. संस्थेचे अध्यक्ष शेख मोहम्मद रफीक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन सत्कार केला. या प्रसंगी त्यांनी हजरत मौलाना मख्दुम हुसैन साहब उर्दू हायस्कूल चा निकाल ९८ टक्के व मखदुमियॉं कॉलेज ऑफ सायन्स चा निकाल १०० टक्के लागल्याने समाधान व्यक्त करत सर्व शिक्षकांचे कौतूक केले. यावेळी  १० वी च्या परीक्षेत यश संपादन केलेल्या कु.बुशरा फिरोज मन्सूरी (प्रथम ८९%), कु.अक्सा वसीम शेख (द्वितीय ८७%), अर्जुमंद अकील सय्यद (तृतीय ८६%), तसेच १२ वी च्या परीक्षेत उत्कृष्ट उत्तीर्ण झालेल्या फैज़ान अ.करीम सय्यद (प्रथम ७६%), उम्मेहानी असलम जहागीरदार (द्वितीय ७४%) व सानिया कादीर मेमन (तृतीय ७३%), या यश संपादन...

🙏सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏 काल दिनांक ३० ऑगस्ट २०२२ रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त माझे मित्र बंधू,माता भगीनी, नातेवाईक,पत्रकार,राजकीय, अराजकीय,शासकीय, प्रशासकीय, निमशासकी, अधिकारी,पदाधिकारी,कर्मचारी,सामाजिक,

 🙏सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏 काल दिनांक ३० ऑगस्ट २०२२ रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त माझे मित्र बंधू,माता भगीनी, नातेवाईक,पत्रकार,राजकीय, अराजकीय,शासकीय, प्रशासकीय, निमशासकी, अधिकारी,पदाधिकारी,कर्मचारी,सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक साहित्यिक,अध्यात्मिक,धार्मिक, व्यावसायिक आदि क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्येक्ष, अप्रत्येक्ष, भेटून/फोन कॉलवर/वर्तमानपत्र/न्यूज पोर्टल/ व्हॅटसअप, फेसबुक,इन्स्टाग्राम आदि प्रसार माध्यमांत तर काही मान्यवरांनी आपल्या व्हॅटसअप डी.पी./ व्हॅटसअप स्टेटसवर शुभेच्छा देत दाखवलेले आपले स्नेह,प्रेम, आपुलकी याबाबत मी आपणा सर्वांचा शतशः ऋणी आहे, माझ्या वाढदिवसा प्रसंगी आपण भरभरुन दिलेले स्नेह,प्रेम आणि आशिर्वाद ही माझ्या जिवनातील महत्वाची शिदोरीच असल्याने भविष्यातील माझ्या पुढील सामाजिक कार्यास अधिक बळ प्राप्त झाले आहे,यापुढे देखील आपले असेच स्नेह,प्रेम आणि आशिर्वाद मिळत रहावो अशी अपेक्षा व्यक्त करत पुन्हा एकदा आपणा सर्वांचे खुप खुप मनःपूर्वक आभार.धन्यवाद 🙏 आपला बंधू शौकतभाई शेख संस्थापक अध्यक्ष : स्वाभिमानी संपादक सेवा संघ (महाराष्ट्र प्रदेश) अध्यक्ष: समता फाऊंडेशन, श्...

बावडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणाऱ्या 27 गावातील अवैध दारू विक्री व अवैध धंदे बंद करा

 बावडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणाऱ्या 27 गावातील अवैध  दारू विक्री व अवैध धंदे  बंद करण्यात यावे या मागणीसाठी संभाजी मधुकर चव्हाण यांचे बावडा पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख) बावडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणाऱ्या 27 गावातील अवैध  दारू विक्री व अवैध धंदे  बंद करण्यात यावे या मागणीसाठी संभाजी मधुकर चव्हाण यांचे बावडा पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन चालू  असून जोपर्यंत बावडा पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या 27 गावातील अवैध दारू विक्री व अवैध धंदे बंद करत नाही तोपर्यंत मी बावडा पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन करीत असल्याचेही संभाजी मधुकर चव्हाण यांनी सांगितले याबाबत माहिती अशी की संभाजी मधुकर चव्हाण यांनी दिनांक 26/ 8 /2022 रोजी बावडा पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले. बावडा पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात संभाजी मधुकर चव्हाण यांनी असे म्हटले आहे की बावडा पोलीस स्टेशन अंतर्गत 27 गावांमध्ये पोलिसांच्या आशीर्वादाने दारू विक्री व इतर धंदे चालू असल्याचे दबक्या  आवाजात बोलले जात आहे.  आणि सदर बाब समाजाला घातक आहे तरी त्या सर्व 27 ...

इंदापूर पोलीस स्टेशन चा गुन्हेगारावर वचक कमी होतोय का?

 इंदापूर पोलीस स्टेशन चा गुन्हेगारावर वचक कमी होतोय का? (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख) इंदापूर पोलीस स्टेशनचे पीआय मुजावर साहेब यांनी एक दिवसा आड  एक धडाकेबाज कारवाई करून गुटखा असो किंवा इतर अवैध  धंद्यावर   त्यांनी कडक  कायदेशीर कारवाई केली परंतु दुसरी बाजू असे की इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या महिला सामान्य नागरिक यांना अपमानाची व हेळसाडूनंपणाची वागणूक दिले जात आहे. कित्येकदा संबंधित अधिकारीही महिलांना एकेरी भाषेचा उल्लेख करताना दिसत आहे जर तुमची तक्रार नोंदवायची असेल तर संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितल्याशिवाय तक्रार नोंद होत नाही. इंदापूर पोलीस स्टेशन मधील काही पोलीस कर्मचारी लक्ष्मी दर्शन होत असेल याच मॅटर मध्ये लक्ष घालताना दिसत आहे.  इंदापूर पोलीस स्टेशनला एक महिला संबंधित गाळ्याचे डिपॉझिट गाळेमालका कडून मिळावे यासाठी इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये महिना झाले इंदापूर पोलीस मध्ये चकरा मारून सुद्धा इंदापूर पोलीस स्टेशनने संबंधित त्या गाळे मालकाला इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्याच्या वर काहीही कारवाई करताना दिसत नाही यावरून अ...

स्टार्ट अप महाराष्ट्र योजनेतून नव उद्योजक निश्र्चितपणे तयार होतील = बापुसाहेब पुजारी

 स्टार्ट अप महाराष्ट्र योजनेतून नव उद्योजक निश्र्चितपणे तयार होतील = बापुसाहेब पुजारी श्रीरामपूर (शौकतभाई शेख) :  स्टार्ट अप महाराष्ट्र योजनेतून नव उद्योजक निश्र्चितपणे तयार होतील असे उद्गार बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त व जेटीएस शिक्षण संकुलाचे चेअरमन बापूसाहेब पुजारी यांनी काढले.  ते पुढे म्हणाले की,महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८ मध्ये जाहीर झाले. यशस्वी उद्योजक घडवण्यासाठी स्थापना, गुणवत्ता ,परीक्षण व बौद्धिक मालमत्ता हक्कासाठी अर्थसहाय्य, ग्रँड चॅलेंज, स्टार्टअप वीक यांसारख्या योजना राबवल्या गेल्या आहेत. नाविन्यता व  कल्पकता असेल योग्य पाठबळ असेल ,योग्य मार्गदर्शन असेल तर नवनवीन उद्योजक निश्चितपणे तयार होतील असेही ते म्हणाले. तालुक्यातील बेलापूर येथील कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त शेखर डावरे, शिक्षक प्रतिनिधी सुनिता ग्रोव्हर उपस्थित होते.प्रास्ताविक आयटीआय कॉलेजचे प्राचार्य विकास थोटे यांनी केले. ते म्हणाले की,या योजनेसाठी क्यूआर कोड दिलेला आहे. नावनोंदणी करुन प्रोजेक्ट सादर केला तर महाराष्ट्र शासनाकड...

नवोदित पत्रकार,संपादकांचे मार्गदर्शक,ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्ताने......!

 नवोदित पत्रकार,संपादकांचे मार्गदर्शक,ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्ताने......! आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ! माझ्या एकट्याच्याच नव्हे, तर तुम्हाला मानणाऱ्या राज्यातील हजारो पत्रकारांच्या शुभेच्छा !  तुमची कर्तबगारी तुम्हाला यापुढे अधिक यश मिळवून देईल,असा विश्वास महाराष्ट्रातील नवोदित संपादक व पत्रकारांना निश्चितपणे आहे. वाढदिवस हे निमित्त आहे. या दिवशी शुभेच्छांचा वर्षाव होतोच. पण या शुभेच्छा एका दिवसापुरत्या मर्यादित नाहीत तर त्या वर्षाच्या ३६५ दिवसांकरिता आहेत.तुम्ही आम्हा तरुण संपादक व पत्रकारांचे मार्गदर्शक आहात. एकीकडे तुमच्यासारखे आदर्श नेतृत्व आणि दुसरीकडे तुमच्या कामाच्या झपाट्याने भारावलेले आम्ही सगळे पत्रकार. त्यातूनच एक शक्ती आपोआप निर्माण होत आहे. तुमचे नेतृत्व माझ्यासारख्यांना भावले, याची कारणे अतिशय वेगळी आहेत. अगदी मोकळेपणाने सांगतो. समाजाच्या आणि संपादक व पत्रकारांच्या प्रश्नांसाठी स्वत:ला झोकून दिलेत. अविरत काम करण्याची तुमची धमक हे तुमचे विलक्षण सामर्थ्य आहे. मेहनत आणि जिद्द तुमच्याकडून शिकावी.राज्यातील शहरी आणि ग्रामीण ...

अशोक' च्या ऊस उत्पादन घट अनुदानाची २ कोटी ३८ लाख रक्कम आज वर्ग - माजी आ.मुरकुटे

 अशोक' च्या ऊस उत्पादन घट अनुदानाची २ कोटी ३८ लाख रक्कम आज वर्ग - माजी आ.मुरकुटे श्रीरामपूर (शौकतभाई शेख) :  अशोक कारखाना व्यवस्थापनाने सन २०२१-२२ च्या गळित हंगामात १६ एप्रिल ते १३ जून २०२२ या कालावधित गळितास आलेल्या ऊसाच्या 'ऊस उत्पादन घट' अनुदानापोटी २ कोटी ३८ लाख ४९ हजार इतकी रक्कम संबंधित ऊस उत्पादक शेतक-यांचे बँक खाती आज मंगळवार (ता.३०) रोजी वर्ग केली जाणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी दिली. याबाबत माहिती देताना श्री.मुरकुटे यांनी सांगितले की, गेल्या सन २०२१-२२ च्या गळित हंगामात ऊसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऊसाच्या तोडी लांबल्या. त्यामुळे हंगाम जून महिन्यापर्यंत चालला. यात सभासद, ऊस उत्पादकांना ऊस तोडणीचा त्रास झाला. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने १६ एप्रिल ते ३० एप्रिल २०२२ या कालावधित गाळपास आलेल्या ऊसास प्रतिटन रुपये ५०, १ मे ते ३१ मे २०२२ या कालावधित गाळपास आलेल्या ऊसास प्रतिटन रुपये १०० तर १ जून ते १३ जून २०२२ या कालावधित गाळपास आलेल्या ऊसास प्रतिटन रुपये २०० याप्रमाणे उस उत्पादन घट अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त...

सधन व्यक्तींनी अन्नसुरक्षा योजनेतुन बाहेर पडावे तहसीलदार प्रशांत पाटील यांचे अवाहन

 सधन व्यक्तींनी अन्नसुरक्षा योजनेतुन बाहेर पडावे  तहसीलदार प्रशांत पाटील यांचे अवाहन श्रीरामपुर (शौकतभाई शेख) : शासनावर येणारा आर्थिक भार कमी होण्याच्या दृष्टीने तसेच योग्य व गरजु लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ मिळावा या करीता सधन व्यक्तीनी अनुदानातुन बाहेर पडावे असे अवाहन श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.                                             शासनाने गरजु व्यक्तीना कमी दरात अन्नधान्य उपलब्ध करुन दिले असुन आजही बरेच लाभार्थी शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेपासुन दुर आहे, गाव व शहर निहाय ठरवुन दिलेला ईष्टांक पुर्ण झाल्यामुळे गरजुंना लाभ देणे शक्य होत नाही, अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे कालांतराने उत्पन्न वाढले असेल तर त्यांनी या योजनेतुन बाहेर पडावे आपण असे केल्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याकरीता शासनावर येणारा आर्थिक भार कमी होणार आहे,आपण आज स्वातंत्र्याचा अमृत महो...

गावाच्या विकास कामासाठी सहकार्य करा - सरपंच बाबासाहेब चिडे श्रीरामपूर/प्रतिनिधी (संदीप आसने)

 गावाच्या विकास कामासाठी सहकार्य करा - सरपंच बाबासाहेब चिडे श्रीरामपूर/प्रतिनिधी (संदीप आसने) ग्रामपंचायत आणि ग्रामसभा हे गावाच्या विकासाचे साधन आहे सत्य मध्ये सरपंच कुणीही असो राजकारण आज आहे उद्या नाही राजकारण हेवेदावे बाजूला ठेवून गावाच्या विकास कामाला साथ द्यावी. गावाचा विकास थांबवू नका विकास कामाला विरोध करू नका असे आवाहन माळवाडगाव ग्रामपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब चिडे यांनी माळवाडगाव ग्रामपंचायतच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत उपस्थित समोर केले.          माळवाडगाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुदामराव आसने उपाध्यक्ष नानासाहेब आसने आणि ग्रामसेवक आगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब चिडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा शांततेत विविध विकास कामाच्या प्रश्नावर चर्चा होऊन खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी गावातील नवीन शॉपिंग सेंटर, घरकुल, पोलीस चौकी, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, सीसीटीव्ही कॅमेरे, शाळेतील स्वच्छता, विविध रस्ते, पिण्याचे पाणी, स्टेट लाईट,सर्व प्रकारची थकित कर वसुली तसेच छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृत...

महादेव जानकर ! एक खडतर, तरीही “यशस्वी” प्रवास...

 महादेव जानकर ! एक खडतर, तरीही “यशस्वी” प्रवास...  माणूस कोठे पोहोचला, या पेक्षा तो कोठुन कोठे पोहोचला यावरून त्याला यशस्वी ठरविले पाहिजे, असे कोण्या एका विचारवंताने म्हटले आहे. राजाचा मुलगा जन्मताच राजपुत्र बनतो., नंतर तो राजा बनतो. एखादा दिल्लीस एका तासात पोहोचतो कारण तो जवळच आग्र्याला रहात असतो. परंतु दूर दक्षिणेत, सातार्याच्या रानमाळावर जन्म घेणारा जेंव्हा दिल्लीची वाट चालू लागतो, तेव्हा तो दिल्लीत पोहोचला की नाही या पेक्षा आता तो कोठे पोहोचला, यावरून त्याच्या यश-अपयशाचे मोजमाप केले जावे. वरील विचारवंताच्या म्हणण्याचा तोच मतितार्थ आहे. महादेव जानकर यांचा जन्म मेंढरामागे फिरणार्या भटक्या, गरीब, धनगर कुटूंबात सातार्याच्या एका रानमाळावर झाला. गावी, तालुक्याच्या गावी, जिल्ह्याच्या ठिकाणी शिकत बी. ई. झाला. चांगली नोकरी करुन सुखाचा संसार थाटण्याचे सोडून समाजकारणासाठी - राजकारणासाठी तारुण्य सुलभ भावनेचा त्याग करुन समाजाचा संसार थाटण्याचा निर्धार तरुण महादेव जानकर याने केला. देवा – समाजा समोर तशी शपथ घेतली. माता – पिता - नात्याचा त्याग केला आणि एका खडतर प्रवासाचा आरंभ २५ वर्षापूर्...

घराघरात नळ पाणीपुरवठा योजना पोहोचवणारच-आमदार दत्तात्रय भरणे

 *घराघरात नळ पाणीपुरवठा योजना पोहोचवणारच-आमदार दत्तात्रय भरणे *आमदार दत्तात्रय भरणे यांचे बळपुडी येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभाप्रसंगी प्रतिपादन...................... जनतेने निवडून दिलेल्या आमदारांनी जनतेच्या मूलभूत प्रश्नांच्या विकासासाठी मंजूर केलेल्या कामांचे फुकटचे श्रेय घेऊ नये असे सांगत आमदार दत्तात्रय भरणे यांची विरोधकांवर चौफेर टीका.........*  मौजे बळपुडी गावात जलनायक आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते  जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ करण्यात आला या योजने करिता तब्बल 1 कोटी 30  लाख निधी मंजूर करण्यात आला आहे  यावेळी विकासरत्न आमदार भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील 146 गावातील जल जीवन मिशन या योजनेचा प्रारूप आराखडा दिनांक 12 मार्च 2021 रोजी पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे 250 कोटी रुपये इतका मंजूर करण्यात आला होता त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये योजनेचे डी एस आर रेट वाढल्याने तसेच प्रत्यक्ष सर्वेक्षण केल्याने या योजनेचा आराखडा जवळपास 454 कोटी रुपये इतका करण्यात आला या यो...

सौ तनुजा अनंता गुळवी यांची निवड

 सौ तनुजा अनंता गुळवी यांची निवड इंदापूर प्रतिनिधी शिवराज्य शेतकरी विकास मंच महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षपदी ठाणे जिल्ह्यातील सौ तनुजा अनंता गुळवी यांची निवड करण्यात आली सदर त्यांना निवडीचे पत्र शिवराज्य शेतकरी विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष पत्रकार जावेद शेख यांनी दिले. यावेळी शिवराज्य शेतकरी विकास मंचा महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा वर्षा रंणजीत राऊत तसेच शिवराज्य शेतकरी विकास मंचचे कार्याध्यक्ष वैभव सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र आघाडी महिला अध्यक्ष ज्योतीताई गाढवे, तसेच सोहेल तांबोळी अलीअकबर मणेरी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. शिवराज्य शेतकरी विकास मंच महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सौ तनुजा आनंत गुळवी यांनी महाराष्ट्रातील होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका व येणारी लोकसभा शिवराज्य शेतकरी विकास मंच पूर्ण ताकदनिशी लढणार असेही सांगितले. महाराष्ट्र सह ठाणे जिल्ह्यात शिवराज्य शेतकरी विकास मंचा शाखा ओपन करणार असून गरीब कष्टकरी शेतकरी मजूर महिला अपंग यांना न्याय देण्यासाठी मी सर्वत्र प्रयत्न करणार असल्याचेही निवडून नं...

स्वस्त धान्य दुकानदारांनी आयएसओ मानांकनासाठी दुकाने सज्ज ठेवावीत ; जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी

 स्वस्त धान्य दुकानदारांनी आयएसओ मानांकनासाठी दुकाने सज्ज ठेवावीत ; जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी श्रीरामपुर (शौकतभाई शेख) :  शासन मान्य स्वस्त धान्य दुकानदारांच्या उत्पन्नाचा स्रोत वाढावा म्हणून शासनाने अनेक व्यवसाय धान्य दुकानाच्या माध्यमातून सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असुन या करीता सर्व परवानाधारक स्वस्त धान्य दुकानदारांनी आयएसओ मानांकनासाठी आपली दुकाने सज्ज ठेवावी असे अवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी केले.                स्वस्त धान्य दुकानांकरीता आयएसओ मानांकन आणि विविध व्यवसाय प्रशिक्षण संदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी बोलत होत्या,  पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, सर्व सामान्य नागरीकांचा स्वस्त धान्य दुकानदारांशी कायमचा संपर्क असतो,त्यातच धान्य दुकानदारांना तुटपुंज्या प्रमाणात कमिशन मिळत असल्यामुळे  दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ व्हावी तसेच नागरीकांना चांगली सेवा मिळावी या हेतूने शासनाने सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना काँमन सर्व्हिस सेंटरचा...

साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती निमित्ताने आज रेडा गावातील समाज मंदिरामध्ये प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आमदार दत्तात्रेय भरणे यांनी अभिवादन केले

 साहित्य सम्राट  लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती निमित्ताने आज रेडा गावातील समाज मंदिरामध्ये प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आमदार दत्तात्रेय भरणे यांनी अभिवादन केले  यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी रेडा गावातील तरुणांनी अभ्यास करून चांगले ठिकाणी नोकरी, व्यवसाय करावा यासाठी रेडा गावामध्ये 7 लाख इतका निधी अभ्यासिका बांधण्यासाठी मंजूर करण्यात येईल अशी ग्वाही दिली यावेळी ऍड देवकर ,सचिन सपकाळ शुभम निंबाळकर,पोपट देवकर,ऍड योगेश देवकर,तसेच गावातील सर्व मातंग समाजातील तरुण वर्ग उपस्थित होता

बेलापूरात संत सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्सहात साजरी

 बेलापूरात संत सेना महाराज यांची  पुण्यतिथी मोठ्या उत्सहात साजरी बेलापूर (प्रतिनिधी) : वारकरी संप्रदायातील महान संत श्रेष्ठ श्री संत सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.श्री संत सेनाजी महाराजांच्या प्रतिमेची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुक झेंडा चौकात आल्यानंतर समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सुभाष सोनवणे, प्रतापराव हुडे, गोरक्षनाथ कणसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे सरपंच महेंद्र साळवी,अरुण नाईक, अभिषेक खंडागळे, रविंद्र खटोड, विलास मेहेत्रे, अनिल पवार, भास्कर बंगाळ यांनी पुजन केले. सकाळी मनोज कुटे व सौ.स्नेहल कुटे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली.संत सेना महाराजांची मिरवणूक झेंडा चौकात आल्यानंतर बेलापूरचे प्रथम नागरीक तथा सरपंच महेंद्र साळवी,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक, खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड, समता परिषदेचे प्रकाश कुऱ्हे, चंद्रकांत नाईक, पत्रकार देविदास देसाई, भास्कर बंगाळ, शिवाजी वाबळे आदिंनी संत सेना महाराजांच्...

अहिल्यादेवी म्हणजे जगातील सर्वात लोक कल्याणकारी महाराणी. नाथाभाऊ शेवाळे.

 अहिल्यादेवी म्हणजे जगातील सर्वात लोक कल्याणकारी महाराणी. नाथाभाऊ शेवाळे.          पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 227 व्या पुण्यतिथीनिमित्त इंदापूर येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला होता सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे बोलताना म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये देशभर कार्यरत राहून अनेक लोकोपकारी कार्य केले त्यांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा बंद केल्या त्याचबरोबर योग्य तो न्यायनिवाडा केला स्वतःच्या खाजगी उत्पन्नातील संपत्ती मंदिरे धर्मशाळा नदीवरील घाट रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड, वाटसरूंना पाणी पिण्यासाठी बारवा बांधल्या असे अनेक कार्य त्यांनी केले त्यांच्या एवढे दानशूर व न्यायप्रिय प्रजाहितदक्ष महाराणी इतिहासात दुसरे कोणीही झाले नाही. सदर कार्यक्रमाचे आयोजन इंदापूर येथील पोपट् नाना पवार मित्र मंडळाने केले होते यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोपने, सामाजिक कार्यकर्त्या विजयाताई कोकाटे शिरूर तालुका रासपाचे अध्यक्ष शिवाजीराव कुराडे च...

लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी आणि आपल्या मतदानाच्या हक्का बाबात “माझा गणेशोत्सव माझा मताधिकार” ही संकल्पना यंदाच्या वर्षी निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येत असून यामध्ये विविध गणेश मंडळांनी आपापल्या गणेश मंडळाच्या ठिकाणी त्या अंतर्गत जनजागृती करणारे देखावे साकारुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केलं आहे.

  शुक्रवारी दि. २६ आँगस्ट रोजी इंदापूर तहसील कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान प्रांताधिकारी कांबळे बोलत होते.यावेळी तहसिलदार श्रीकांत पाटील, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, नायब तहसिलदार अनिल ठोंबरे, नायब तहसीलदार क्षितिजा वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक दाजीबा देठे, इंदापूर नगरपरिषद कार्यालयीन अधिक्षक वर्षा क्षिरसागर यांसह इंदापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व इंदापूर शहरासह तालुक्यातील विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी, पोलीस पाटील आदी उपस्थित होते. सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव साजरा करीत असताना शासनाकडून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी आणि आपल्या मतदानाच्या हक्का बाबात “माझा गणेशोत्सव माझा मताधिकार” ही संकल्पना यंदाच्या वर्षी निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येत असून यामध्ये विविध गणेश मंडळांनी आपापल्या गणेश मंडळाच्या ठिकाणी त्या अंतर्गत जनजागृती करणारे देखावे साकारुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केलं आहे. दादासाहेब कांबळे म्हणाले की, ३१ आँगस्ट २०२२ ते ९ सप्टेंबर २०२२ या दरम्यान हा उपक...

बिलकीसबानो प्रकरणी दोषींची सुटका रद्द होऊन त्यांना कठोर शिक्षा व्हावी ; आदीलभाई मखदूमी

 बिलकीसबानो प्रकरणी दोषींची सुटका रद्द होऊन त्यांना कठोर शिक्षा व्हावी ; आदीलभाई मखदूमी  एम.आय.एम.तर्फे श्रीरामपूर शहरात भव्य  मुक मोर्चाद्वारे ; महसूल प्रशासनाला निवेदन   श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : बिलकीस बानो प्रकरणी दोषी आरोपींना सोडून न देता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा मागणीकरीता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (AIMIM) चे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष आदिलभाई मखदुमी यांच्या नेतृत्वाखाली शहरातून भव्य असा मुक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते, पदाधिकारी, एकजुटीने सहभागी झाले होते,यावेळी एम.आय. एम. पक्षातर्फे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष आदीलभाई मखदूमी आणी कार्यकर्त्यांद्वारे महसुल प्रशासनाला निवेदन देण्यात आले. आदील मखदुमी यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सन २००२ मध्ये गुजरात राज्यात भयानक जातीय दंगल घडली व संपुर्ण जगाला हादरुन टाकणारी घटना या दंगलीमध्ये घडली. सुमारे ११ नराधामांनी माणुसकीला काळीमा फासणारे घाणेरडे कृत्य एका निरापराध २२ वर्षीय बिलकीसबानो यांच्यावर सामुहिक अत्याचार केले. शिवाय त्या त्यावेळी ५ ...

स्वाभिमानी संपादक सेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी उद्धव फंगाळ यांची नियुक्ती

 स्वाभिमानी संपादक सेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी उद्धव फंगाळ यांची नियुक्ती रमेश जेठे (सर) अहमदनगर : मेहकर जि.बुलढाणा येथील धडाडीचे अभ्यासू पत्रकार आणि "दैनिक मेहकर टाईम्स"चे वृत्त संपादक श्री.उद्धव श्रीराम फंगाळ  यांची "स्वाभिमानी संपादक सेवा संघ" या वार्ताहर - संपादकांच्या राज्यव्यापी संस्थेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली गेली असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख यांनी सांगितले, स्वाभिमानी संपादक सेवा संघ ही राज्यव्यापी संस्था नवोदित वार्ताहर,संपादक यासोबतच मुद्रण क्षेत्रातील सर्वच श्रमीकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने प्रयत्नशील असते, प्रत्येक्ष, अप्रत्येक्ष नवोदित संपादक, वार्ताहर यांच्यावर होणारे अन्याय अत्याचारास वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देणे,तसेच नवोदित वार्ताहर, संपादक यांच्यासाठी विविध मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करुन शासन दरबारी त्यांना येणाऱ्या विविध आडचणी सोडविणेकामी सातत्याने पुढाकार घेते,तसेच विविध लघू प्रसार माध्यमे आणि मुद्रण क्षेत्रातील गरजू श्रमिकांसाठी विविध समाजाभिमूख उपक्रम राबवून त्यांच्या आडीआडचणी समजून घेत त...

ग्रामस्थांचा सर्वागिण विकास करण्याचा ग्रामसभांना व्यापक अधिकार ; अधिकाधिक जनजागृती होणे गरजेचे= अशोक सब्बन

 ग्रामस्थांचा सर्वागिण विकास करण्याचा ग्रामसभांना व्यापक अधिकार ; अधिकाधिक जनजागृती होणे गरजेचे= अशोक सब्बन श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : गावात ग्राम सभेचे सदस्य असलेले ग्रामस्थ हेच सरकार असून ग्रामस्थांनी त्यावर लक्ष केंद्रित करून सक्रीय सहभागीता करुन गावाचा व आपला विकास करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भ्रष्टाचार विरोधी जनांदोलनाचे राज्य सरचिटणीस अशोक सब्बन यांनी कोऱ्हाळे येथे  कार्यक्रमात बोलताना केले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे निमित्ताने निळवंडे कालवा कृती समितीच्या कोऱ्हाळे व भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन च्या राहाता शाखेच्यावतीने ज्येष्ठ कार्यकर्ते सोमनाथ दरंदले यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी भारतीय संविधानाचे पूजन भ्रष्टाचार विरोधी जनांदोलनाचे सरचिटणीस अशोक सब्बन  यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रा.एल.एम.डांगे,कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,समितीचे ज्येष्ठ नेते सोमनाथ दरंदले,डॉ.शिंदे दीपक,ज्ञानेश्वर चौधरी,बुद्धिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सतीश निकम,जनार्दन ...

रस्त्यात पार्किंग कि ,पार्किंग मध्ये रस्ता इंदापूर पंचायत समिती समोर दुचाकीस्वारांची बेकायदेशीर पार्किंग अपघाताला निमंत्रण

 रस्त्यात पार्किंग कि ,पार्किंग मध्ये रस्ता इंदापूर पंचायत समिती समोर दुचाकीस्वारांची बेकायदेशीर पार्किंग अपघाताला निमंत्रण इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख इंदापूर तालुक्याचा कारभार पाहणाऱ्या इंदापूर पंचायती समोरच भर रस्त्यात दुचाकीस्वारांनी बेकायदेशीरपणे पार्किंग करून रस्त्याला अडथळा निर्माण करून अपघाताला निमंत्रण देत आहे . गट विकास अधिकारी इंदापूर यांची प्रतिक्रिया इंदापूर गटविकास अधिकारी यांना मोबाईल द्वारे प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले बेकादेशीर पार्किंग आहे तर मी काय करू सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता रस्ता आहे तो नगरपालिकेचा आहे असे उर्मटपणे उत्तर दिले. इंदापूर पंचायती समोर लावलेल्या बेकायदेशीर दुचाकीस्वार यांनी रस्त्यावर पार्किंग केले की पार्किंग मध्ये रस्ता आहे असे जनतेमधून बोलले जात आहे सदर याप्रकरणी इंदापूर पंचायत समितीने कायदेशीर कारवाई करण्याचे गरजेचे असताना सुद्धा इंदापूर पंचायत समिती बग्याची भूमिका घेत असल्याचे दिसून आले इंदापूर पंचायतीसमोर लावलेल्या या बेकायदेशीर दुचाकी पार्किंग मुळे आज दिवसभरात पुणे सोलापूर हायवे गावातील रस्त्याला अडथळा निर्माण झाला होता यामुळ...

मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळेतील आधार नोंदणी कॅम्प ला उस्फुर्त प्रतिसाद

 मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळेतील  आधार नोंदणी कॅम्प ला उस्फुर्त प्रतिसाद श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : शेवगांव येथील युवा नेते अजिंक्य लांडे, इम्रान शेख आणि मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळेचे संचालक जमीर पठाण सर यांच्या संयुक्त विद्यमाने आधार नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते,शासनाचे जास्तीत जास्त आधार नोंदणीचे धोरण आणि नागरिकांची होणारी  गैरसोय दूर करण्याच्या दुहेरी हेतूेने मौलाना  आझाद उर्दू प्राथमिक शाळेचे संचालक जमीर सर, युवा नेते अजिंक्य लांडे आणि इम्रान शेख यांनी पुढाकार घेऊन सदरील नोंदणी कॅम्प लाऊन जनतेला सेवा दिली सदरील नोंदणी कॅम्प  ठिकाणी नागरिकांनी भरपूर गर्दी केली होती. शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजाभिमुक उपक्रम कार्यक्रम घेण्यात मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळा ही नेहमी अग्रेसर असते याची प्रचिती या कार्यक्रमातून झाली. शासनाचे घरघर आधार आणि जास्तीत जास्त आधार नोंदणी चे धोरण पूर्णत्वाकडे नेण्यासाठी शेवगांव आधार केंद्र चे प्रमुख श्री.आसिफ सय्यद सर यांनी चांगलेच मनावर घेतलेले दिसले, शासनाच्या या धोरणाची अंम...

राज्य मानवी हक्क आयोग आणि लोकायुक्त कार्यालयामधील ५० टक्के पदे रिक्त, मुख्य सचिव,गृह मंत्रालय प्रधान सचिव सह ४ जणांना कायदेशीर नोटीसा

  राज्य मानवी हक्क आयोग आणि लोकायुक्त कार्यालयामधील ५० टक्के पदे रिक्त, मुख्य सचिव,गृह मंत्रालय प्रधान सचिव सह ४ जणांना कायदेशीर नोटीसा राज्य मानवी हक्क आयोग आणि लोकायुक्त कार्यालय या अस्थापनांमध्ये रिक्त असणारे पदे आणि त्यामुळे मानवी हक्कांच्या संदर्भातील प्रलंबित असणाऱ्या खटल्यांचा प्रश्न तसेच भ्रष्टाचार बाबतच प्रश्न आता मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.  संसदेने मानवी हक्कांच्या संरक्षांच्या उद्देशाने पारित केलेल्या मानवी हक्क संरक्षण कायदा, १९९४ या अंतर्गत स्थापन केलेल्या राज्य मानवी हक्क आयोग या राज्याच्या पातळीवर असणाऱ्या आयोगात मोठ्या प्रमाणात महत्वाची पदे रिक्त आहेत आणि त्यामुळे मानवी हक्काचे खटले प्रलंबित आहेत. तसेच लोकयुक्त या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात महत्वाची पदे रिक्त आहेत. अशी माहिती मानवी हक्क कार्यकर्ते मनीष देशपांडे यांनी केलेल्या माहिती अधिकार अर्जातून समोर आली आहे. याबाबत बोलताना मनीष देशपांडे म्हणाले कि “राज्य मानवी हक्क आयोगाची भूमिका हि मानवी हक्क संरक्षणाच्या दृष्टीकोनातून खूप महत्वची आहे आणि यामध्ये असणाऱ्या रिक्तपदांमुळे मानवी हक्कांसंदर्भातील समस्य...

बिलकीसबानो गॅंगरेप आरोपी प्रकरणी जोएफ जमादार यांचे महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन

 बिलकीसबानो गॅंगरेप आरोपी प्रकरणी जोएफ जमादार यांचे महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन बिलकीसबाने गॅंगरेप प्रकरणी सोडून देण्यात आलेल्या दोषी आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी, अन्यथा आंदोलन = जोएफ जमादार श्रीरामपुर (प्रतिनिधी) : सन २००२ साली गुजरात राज्यातील गोधरा दंगलीनंतर बिलकीस बानोवर झालेल्या गॅंगरेप व तिच्या परिवारातील सात सदस्यांची करण्यात आलेल्या हत्ये  बाबत संबंधित आरोपींना मे. न्यायालयाने दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती परंतू दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी संबंधित आरोपींना सोडून देण्यात आले ही कृती सरकारची अशोभनीय आहे, दोषी आरोपींना सोडून देण्याचा आदेश त्वरित रद्द करत तात्काळ दोषींना फासावर चढवा असे समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,आम्ही आपणांस या लेखी तक्रारीद्वारे निवेदन करतो की, जर मे.न्यायालयाने संबंधित आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती,तर मग त्यांना सोडून देण्यात आलेच कसे ?, आपला देश हा जगाच्या धर्तीवर एकम...

स्वामी समर्थ दिंव्याग महिला बचत गट इंदापूर शहर यांना आज बॅक ऑफ इंडीया यांच्याकडून 5 लाख कर्ज वाटप

  स्वामी समर्थ दिंव्याग महिला बचत गट इंदापूर शहर यांना आज बॅक ऑफ इंडीया यांच्याकडून 5 लाख कर्ज वाटप इंदापूर आज दि.22 रोजी प्रहार अपंग क्रांती संघटना इंदापूर तालुका यांनी केलेल्या पाठ पुराव्या नंतर स्वामी समर्थ दिंव्याग महिला बचत गट इंदापूर शहर यांना आज बॅक ऑफ इंडीया यांच्याकडून 5 लाख कर्ज वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर ..पुजा देशमुख बॅक ऑफ इंडिया शाखाधिकारी... रश्मी बडे कृषी कर्ज अधिकारी ...सुभाष ओहळ नगरपालिका प्रकल्प अधिकारी ...योगिता सरगर  नगरपालिका समुदाय संघटक जि.उपाध्यक्ष मा.बाबासाहेब पाडुळे ता.अध्यक्ष मा.अनंतराव गायकवाड तसेच  महिला बचत गट अध्यक्ष सौ.रत्नमाला पाडुळे सचिव माधुरी परदेशी उपस्थित होते.......

जातीय व धार्मिक उन्माद माजवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी : राहुल डंबाळे

  जातीय व धार्मिक उन्माद माजवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी : राहुल डंबाळे   पुणे : जातीय व धार्मिक उन्माद माजवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने विशेष मोहीम हाती घ्यावी अशी मागणी आज संविधान परिवार च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनातून रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी केली. राजस्थान, सुराणा येथील इंद्र मेघवाल या नऊ वर्षीय विद्यार्थ्यांचा पिण्याच्या पाण्याच्या माठाला हात लावला म्हणुन जातीय कारणातून खून करण्यात आला होता. तसेच गुजरात दंग्याच्या वेळी बिल्कीस बानो या गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिचे नातेवाईकांची व मुलीची हत्या करणाऱ्या नराधम आरोपींची शिक्षा पूर्व सुटका करण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयाविरुद्ध आज पुणे येथील विविध पुरोगामी पक्ष संघटनांच्या संयुक्त विद्यमाने संविधान परिवार तर्फे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शनाचे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. आंदोलनाच्या अनुषंगाने आयोजित निषेध सभेमध्ये भूमिका मांडताना रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी केंद्र सरकार तसेच राजस्थान...

टेंभुर्णी ते कंदर रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावे अन्यथा रास्ता रोको - वर्षा राऊत

 टेंभुर्णी ते कंदर  रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवण्यात  यावे अन्यथा रास्ता रोको - वर्षा राऊत (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख) टेंभुर्णी ते कंदर दरम्यान अनेक खड्डे असून यामुळे अपघात होत आहे. दर दिवशी टेंभुर्णी ते कंदर दरम्यान किरकोळ अपघात होत असून यामुळे अनेकांना आर्थिक शारीरिक नुकसान झालेले आहे. तरी माढा व करमाळा  सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे लक्ष देऊन त्वरित टेंभुर्णी ते कंदर दरम्यान पडलेली खड्डे बुजवावे अन्यथा शिवराज्य शेतकरी विकास मंच च्या माध्यमातून रास्ता रोको करणार असल्याचेही शिवराज्य शेतकरी विकास मंचच्या महिला प्रदेशाध्यक्ष वर्षा रणजित राऊत यांनी सांगितले. टेंभुर्णी मार्गे पुढे हा मार्ग अहमदनगर हुन पुढे अनेक राज्यांशी जोडला जातो त्यामुळे या ठिकाणी अनेक नॅशनल परमिट असलेल्या गाड्यांची वर्दळ असते. सार्वजनिक बांधकाम खाते अजून किती अपघातांची मालिका पाहणार आहे असेही वर्षा राऊत यांनी सांगितले सदर याप्रकरणी त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे  साहेब यांना ई-मेलद्वारे याप्रकरणी माहिती दिलेली आहे.

समता फाऊंडेशनचे कार्य खरोखरच उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणणारे ; शिवाजीराव साळवे

 समता फाऊंडेशनचे कार्य खरोखरच उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणणारे ; शिवाजीराव साळवे  श्रीरामपूर (प्रतिनिधी) : चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांनी येथील समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूटला सदिच्छा भेट दिली असता समता फाऊंडेशनचे अध्यक्ष शौकतभाई शेख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूटचे इंजि. मोहसिन शौकत शेख,चर्मकार संघर्ष समितीचे जिल्हा संघटक दिलीपराव शेंडे (सर), जिल्हा उपाध्यक्ष नामदेव कानडे, श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष प्रेमचंद वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी समता फाऊंडेशन द्वारा चालविले जाणारे विविध सामाजाभिमुख उपक्रमाची माहिती इंजि.मोहसिन शेख यांनी श्री.साळवे यांना दिली. यावेळी बोलताना श्री.साळवे म्हणाले की, सामाजिक कार्यकर्ते शौकतभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली समता फाऊंडेशन संचलित समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूटमध्ये समाजातील उपेक्षित आणि दुर्लक्षित समाज घटकांतील मुला- मुली,महिलांना मोफत कॉम्प्यूटर कोर्सेस यासोबतच लघू व्यावसायिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समता फाऊंडेशनच्या वि...

इंदापूर तालुक्यातील ४ ग्रामसेवक, २ विस्तार अधिकारी, १ माजी सरपंच, २ वकीलावर इंदापूर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

 इंदापूर  तालुक्यातील ४ ग्रामसेवक, २ विस्तार अधिकारी, १ माजी सरपंच, २ वकीलावर इंदापूर पोलिस स्टेशन मध्ये  गुन्हा दाखल  (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख) इंदापूरात सामान्य माणसाची सरकारी गेंड्यांविरोधात १६ वर्षांच्या, २०६ पानांच्या संयमी, कायदेशीर लढ्याची गांधीगिरी..! २००६ ते २०२२..! पण शेवटी ४ ग्रामसेवक, २ विस्तार अधिकारी, १ माजी सरपंच, २ वकील कामाला लागले… इंदापूर शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल..! सत्य परेशान हो सकता है… पराजित नही.. इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी क्रमांक १ मधील सामान्य व्यक्तीने प्रशासकीय कामकाजातील जाणीवपूर्वक चुका व भ्रष्ट मनमानीविरोधात तब्बल १६ वर्षे सनदशीर लढा दिला. अखेर पोलिसांना ग्रामपंचायतीतील भ्रष्ट प्रवृत्तीची दखल घ्यावीच लागली. इंदापूर पोलिसांनी एका मृत व्यक्तीसह १४ जणांविरोधात गु्न्हा दाखल केला असून यामध्ये तब्बल ६ शासकीय अधिकारी, कर्मचारी आहेत. या लढ्याची सुरवात २००६ मध्ये झाली. गावातील हनुमंत वसंत कदम यांनी हा लढा दिलाय. यावरून इंदापूर पोलिसांनी तत्कालीन विस्ताराधिकारी जी.एम. दराडे, प्रशांत बगाडे, या काळातील सरपंच केशर उत्तम जाधव, तेव्हापास...

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर यांचे हस्ते २ कोटी ७७ लाख रु. प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ*

 *पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर यांचे हस्ते २ कोटी ७७ लाख रु. प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ* आज दि.19 आगस्ट रोजी डाॅ. आंबेडकरनगर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे २ कोटी ७७ लाख रुपयाच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा गारटकर याच्यां हस्ते श्रीफळ फोडून  कामाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार मा. दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून व जिल्हा अध्यक्ष मा.प्रदीपदादा गारटकर यांच्या प्रयत्नांतून दलितवस्ती सुधारणा योजने अंतर्गत डाॅ.आंबेडकर नगर,अण्णाभाऊ साठे नगर, लोकमान्य नगर येथील रस्ता करणे २ कोटी १० लाख व नागरी दलितेत्तर  विकास योजना अंतर्गत बंदिस्त गटार रक्कम ६७ लाख, एकुण २ कोठी ७७ लाख या कामाचा श्रीफळ फोडून प्रत्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा गारटकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मा.नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे,माजी नगराध्यक्ष सुरेश नाना गवळी,माजी उपनगराध्यक्ष, राजेश शिंदे,विद्यमान नगरसेविका राजश्री अशोक मखरे,मा...

इंदापूर दुय्यम निबंधक कार्यालयाच्या विरोधात माधुरी चव्हाण यांचे इंदापूर तहसील कार्यालयावर आमरण उपोषण

 इंदापूर दुय्यम निबंधक कार्यालयाच्या विरोधात माधुरी  चव्हाण यांचे इंदापूर तहसील कार्यालयावर आमरण उपोषण न्यायासाठी महिलेची इंदापूर तहसील कार्यालयासमोर उपोषण प्रशासनाने जनाची नाही तरी मनाची लाज बाळगावी (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख) दुय्यम निबंधक सो इंदापूर नोंदणी कार्यालय इंदापूर तालुका जिल्हा पुणे यांना दिलेल्या निवेदनात माधुरी चव्हाण यांनी असे म्हटले आहे की मी वरील विषयास अनुसरून अर्ज करते की आपल्या विभागाला वारंवार अर्ज करून आपल्या निदर्शनास आणून दिले होते व आहे की स्टॅम्प व्हेंडर भगवान कोळेकर हा व्यक्ती केस न्यायप्रविष्ट असताना आपण सदर व्यक्तीस विक्रीस दिलेले आहे या व्यक्तीकडून माझ्या जीवितास धोका असताना वारंवार मी पोलीस संरक्षण चा अर्ज करून देखील आपल्या कडून मला कोणतेच सहकार्य मिळाले नाही. याचाच फायदा घेऊन कोळेकर यांनी एकदा नव्हे तर दोन वेळा माझ्यावर जीवघेणा हल्ला करून आणला. आपल्या कार्यालयात दर काही दिवसांनी दुय्यम निबंधक बदलत आहेत. माझ्या जिवाला धोका असून देखील स्टॅम्प व्हेंडर कोळेकर ला आपण पाठीशी घालत आहात. यावर आपल्याला विचारले असता आपण माझ्याविरुद्ध पोलिसांकडे अर्ज दाख...