Skip to main content

Posts

Showing posts from May, 2021

महिला_कल्याणासाठीचे_कायदे अॅड सुप्रिया विशाल बर्गे 7719050353 आजही महिलांना अन्याय अत्याचारास सामोरे जावे लागते

 💐💐#महिला_कल्याणासाठीचे_कायदे अॅड सुप्रिया विशाल बर्गे 7719050353  आजही महिलांना अन्याय अत्याचारास सामोरे जावे लागते #आई, #बहीण #मुलगी #मैत्रीण या नात्यांना आपण नेहमीच मदत केली आहे. महिलांसाठी अनेक चांगले कायदे आहेत त्याची अंमलबजावणी देखील तितक्याच जलदगतीने होऊन महिलांना न्याय मिळवा. समाजात त्यांना मानाचे स्थान दिले जावे यासाठी समाजप्रबोधनाची, जनजागृतीची, सहकार्याची अपेक्षा मी समाजातील प्रतेक व्यक्तींकडून करते. जसा गुन्हा असेल त्याप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे.  #हुंडा_प्रतिबंधक_कायदा :  १९६१'च्या या कायद्यान्वये हुंडा मागणे आणि हुंडा देणे गुन्हे आहेत. हा कायदा अधिक प्रभावी होण्यासाठी भारतीय दंड संहितेमधे ३०४ (ब) आणि ४९८ (अ) ही नवीन कलमे अंतर्भूत आहेत.  #महिला_संरक्षण_कायदा :  कौटुंबिक छळ (महिला संरक्षण) प्रतिबंधक कायदा स्त्रीला कौटुंबिक, सामाजिक, आथिर्क व शारीरिक संरक्षण देतो. हा कायदा फक्त पुरुषांविरुद्धच लागू होतो. यात अंतरिम आदेश देणे, नुकसान भरपाई देणे, संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती करणे, भागीदारीच्या घरात राहण्याचा अधिकार, कायदेशीर व वैद्यकीय मदत देण्या...

इंदापूर मध्ये बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 इंदापूर मध्ये बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी इंदापूर : येथील डाॅ. आंबेडकरनगर मधील जेतवन बुद्ध विहारात व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती- २०२१ च्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांची २५६५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.      ' विश्वात शांतता प्रस्थापित करण्यासाठी युध्द नव्हे तर बुद्ध हवा आहे. जगाला शांततेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांचा समता आणि शांततेचा विचार या जगाला तारक ठरु शकतो. असे प्रतिपादन पुणे जिल्हा आर.पी.आय. संघटक सचिव शिवाजीराव मखरे यांनी केले. सुरुवातीला नगरसेविका राजश्री अशोक मखरे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले तर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. बौध्दाचार्य बाळासाहेब सरवदे यांनी बुद्ध वंदना, त्रिशरण व पंचशील ग्रहण करुन धम्मपुजा घेतली.      यावेळी पुणे जिल्हा आर. पी. आय. संघटक सचिव शिवाजीराव मखरे, नामांकित बांधकाम व्यावसायिक वास्तुविशारद वसंतराव माळुंजकर, बारामती लोकसभा मतदार संघ आर.पी.आय कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे, आर.पी...

पत्रकार राजेंद्र दुनबळे यांची ऑल इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

 पत्रकार राजेंद्र दुनबळे यांची ऑल इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी निवड शिर्डी (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा दै.महानगरी टाइम्स, न्यूज 1 इंडिया टी.व्ही.चॅनल, महाराष्ट्र भूमी वेब पोर्टलचे प्रतिनिधी आणि स्वाभिमानी संपादक सेवा संघ तथा समता फाऊंडेशनचे सहयोगी पत्रकार राजेंद्र दुनबळे यांची ऑल इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असून या संदर्भात ऑल इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सल्लाऊद्दिन शेख यांनी नुकतेच त्यांना निवडीचे पत्र दिले आहे,  गेली 25 वर्ष सातत्याने पत्रकारिता क्षेत्रात आपल्या उज्वल कार्यांचा ठसा उमठविणारे श्री.दुनबळे यांच्या कार्यास अधिक बळ देणाऱ्या जबाबदारीत आणखी एक भर पडली आहे, इलेक्ट्रॉनिक अॅंड प्रिंट मिडिया क्षेत्रात काम करत असताना श्री.दुनबळे यांचा जनसंपर्क तथा मित्र परिवार मोठ्या प्रमाणात आहे, या नुतन कार्याच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात लवकरच पत्रकारांची नवी टीम तयार करून  आईरा , या संघटनेच्या माध्यमातून कमिटी बनविण्यात येणार असून यासाठी इच्छुक पत्रकारांनी 963775359...

श्रीरामपूर: टीम कोविड केअर च्या वतीने ग्रामीण रुग्णालय व डॉ. आंबेडकर वसतिगृहास स्वच्छतेसाठी आवश्यक कचरा पेट्यांची भेट

 श्रीरामपूर: टीम कोविड केअर च्या वतीने ग्रामीण रुग्णालय व डॉ. आंबेडकर वसतिगृहास स्वच्छतेसाठी आवश्यक कचरा पेट्यांची भेट श्रीरामपूर शहर व तालुक्यात कोविडच्या या महाभयंकर दुसऱ्या लाटेमध्ये गेल्या तीन महिन्यांपासुन टीम कोविड केअर ही सक्रीय पणे सामाजिक भान ठेऊन कार्य करत आहे.ज्यामध्ये सुरुवातीच्या अटीतटीच्या काळात रुग्ण प्राथमिक स्तरावर असताना त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यापासून ते दुर्दैवाने मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार करण्यापर्यंत,त्याचप्रमाणे समाजहितासाठी जनजागृती चा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन तालुक्यात जनजागृतीची रिक्षा फिरवणे असेल किंवा रात्रंदिवस रुग्ण कल्याणा करिता झटणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील स्वच्छतेची काळजी घेताना टीमने स्व खर्चाने स्वच्छता कर्मचाऱ्या ची केलेली नेमणुक असेल अशी अनेक विधायक कामे टीम काम करत आहे. याचाच एक भाग म्हणुन ग्रामीण रुग्णालय व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह येथील कोविड सेंटर याठिकाणी रुग्णांना नित्य वापराकरीता कचरा पेट्या अर्थात डस्ट बिन ची आवश्यकता असल्याने टीम कोविड केअरने 70 डस्ट बिन लगेचच देऊन आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले. यावेळी ग्रामी...

पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारणारा शासनाचा काळा आदेश सरकारने रद्द करावा.

    पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारणारा शासनाचा काळा आदेश सरकारने रद्द करावा.         संयुक्त पत्रकार परिषदेत प्रा. जोगेंद्र कवाडे व जयदीप कवाडे यांची मागणी (इंदापूरचा आवाथ बातमी सेवा नागपूर:दि.२२ दिनांक ७ मे २०२१ चा महाराष्ट्र शासनाचा  पदोन्नतीमधील आरक्षण नाकारणार शासनाचा काळा आदेश असंविधानिक व मागासवर्गीया वर अन्याय करणारा  आहे.सामाजिक न्याय ची पायमल्ली करणाऱ्या या शासनाच्या आदेशाला ठाकरे सरकार ने त्यारीत रद्द करून पदोउन्नती मधील आरक्षण अबाधित ठेवावे अशी मागणी आज झालेल्या पत्रकार परिषदेत प्रा.जोगेंद्र कवाडे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील पदोउन्नती मधील आरक्षनास निर्बंध घातले नाही,या उलट राज्य सरकार आरक्षण देऊ शकते असे सांगितले आहे.परंतु मागास विरोधी यांत्रिण ने शासनाचा काळा आदेश काढून पदोउन्नती मधील आरक्षण कुजविण्याचा प्रयत्न केला आहे.ही बाब अत्यंत गंभीर असून विधिमंडळातील मागासवर्गीय लोकप्रतिनिधीनी शासना चा हा प्रयत्न हणून पाडावा असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले. शासकीय सेवेतील मागासवर्गीयांच...

तर छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलमध्ये मोफत सेवा देणे अशक्य होईल - उमेश चव्हाण

 ....तर छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलमध्ये मोफत सेवा देणे अशक्य होईल - उमेश चव्हाण (इंदापूरचा आवाज पुणे प्रतिनिधी )दि. २१- ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीत, म्हणून रुग्ण हक्क परिषदेने महाराष्ट्र दिन १ मे पासून धानोरी येथे सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलमध्ये सर्वानुमते ९ मे पासून मोफत उपचार सेवा सुरू केली. कोणतीही देणगी, वर्गणी अथवा शासकीय निधीची तरतूद नसताना कोणत्याही संस्थांनी - व्यक्तींनी केलेली मदत अत्यंत तुटपुंजी ठरली आहे, छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलचा रोजचा खर्च एक लाख रुपयांहुन अधिक आहे, आणि दररोज ऐंशी हजार रुपयांना सदर हॉस्पिटल तोट्यात सुरू आहे, यामुळे मोफत उपचार सेवेचा प्रयत्न यशस्वी होत नसून मोफत उपचार सेवा पुढील काळात बंद करावी लागेल, असे रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष व छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलचे संस्थापक उमेश चव्हाण म्हणाले.         लोकांच्या रुग्ण हक्क परिषदेकडून अनेक अपेक्षा असतात, संकटाकाळात वैद्यकीय मदत मिळावी म्हणून दररोज भेटण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बेड उपलब्ध व्हावेत म्हणून म...

तौक्ते चक्रीवादळामुळं झालेली निसर्गाची झळ भरून काढणं गरजेचं महाराष्ट्र शासन वन विभागाचे स्वयंसेवक संदिप कसालकर यांची पालिकेला विनंती अन्यथा भविष्यात प्राणवायूचे चे प्रमाण होऊ शकतं कमी

  तौक्ते चक्रीवादळामुळं झालेली निसर्गाची झळ भरून काढणं गरजेचं महाराष्ट्र शासन वन विभागाचे स्वयंसेवक संदिप कसालकर यांची पालिकेला विनंती अन्यथा भविष्यात प्राणवायूचे चे प्रमाण होऊ शकतं कमी *  मुंबई: विशेष प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने कोकण, गोवा, गुजरात सह संपूर्ण मुंबईत हाहाकार माजला होता. या दरम्यान बऱ्याच घरांचे नुकसान सुद्धा झाले असून दुर्दैवाने काही ठिकाणी जीवितहानी सुद्धा झालेली पाहायला मिळाली. तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा झाडांना झालेला पाहायला मिळाला. या दरम्यान शेकडो वर्षे जुनी असणारी झाडं ही अक्षरशः उन्मळून पडली. अगोदरच विकासकामांसाठी जिवंत झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जातेय तर दुसरीकडे काही समाजकंटक बांधकामादरम्यान आड येणारी जिवंत झाडं ही स्वतःच्या स्वार्थापोटी इंजेक्शन देऊन मारून टाकत आहेत. यामुळे याचा परिणाम आता हा निश्चितचं पर्यावरणावर होणार असल्याचे महाराष्ट्र शासन वनविभागाचे स्वयंसेवक संदिप कसालकर यांनी म्हटलं आहे. दिवसेंदिवस जिवंत झाडांची कत्तल होत असल्यामुळे आता जागतिक तापमानवाढ ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असे म्हणतो यामुळे भविष्यात प्रा...

पत्रकारांनो तुम्ही रूग्णांच्या नजरेत खलनायक, गिधाड झाले आहात - अभय खैरनार (पत्रकार- हिंदूस्थान टाईम्स, पुणे)* *(मुक्काम पोस्ट कोवीड हॉस्पिटल)*

 *पत्रकारांनो तुम्ही रूग्णांच्या नजरेत खलनायक, गिधाड झाले आहात - अभय खैरनार (पत्रकार- हिंदूस्थान टाईम्स, पुणे)*  *(मुक्काम पोस्ट कोवीड हॉस्पिटल)*  कोविडची दुसरी लाट मार्च पासून सुरु झाली. तेव्हापासुन मी आणि माझे कुटुंब याचे शिकार झालो. १० मार्च २१ ला सुरू झालेला हॉस्पिटल चा प्रवास १४ मे २१ ला संपला. या ६५ दिवसाच्या कालावधीत माणसे आणि हॉस्पिटल बदलत गेली पण  कुटुंबातील कोणीतरी एकजण हॉस्पिटलमध्ये होता. या काळात मी स्वतः मार्च मध्ये आठवडाभर वेगळ्या ऑपेरेशन साठी दिनानाथ मंगेशकरला दाखल होतो. २५ एप्रिललाा मला कोविड झाल्याने महापालिकेच्या बाणेर हॉस्पिटलला चार दिवस आणि घरी आल्यावर पुन्हा त्रास झाल्याने पंधरा दिवस राव नर्सिंग होम असा २७ दिवस रूग्णालयात राहिलो . सरकारी, खासगी, isolation, oxygen आणि ICU Bed सगळयांचा अनुभव घेतला आणि रोज मनात असो किंवा नसो या काळात अनेक कोवीड रूग्णांसोबत संवाद घडत गेला. सोबत वेगवेगळ्या कालावधीत घरातील सातजण Positive झाले. त्यापैकी चार जणांना दाखल करावे लागल्याने, रुग्णाच्या नातेवाईकाची मानसिकता काय असते ते पण अनुभवयला मिळाले. त्या अनुभवावर आधारित ...

पुणे सोलापूर हायवे रोडवर बेकायदेशीर कृत्य करणारे विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

इंदापूर पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार  *इंदापुर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर  नंबर काय *459/2021* भा. द. वि. क.  341, 143, 149, 188, 269, 270 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005  चे कलाम 30, 33, 34, 41, 51 व भारतीय साथ रोग कायदा 1897 चे कलम 3, 4  ➡️  *फिर्यादी*  - सिद्धाराम रामन्ना गुरव ब नं 1161 नेमणूक इंदापूर पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण ➡️ *आरोपी* -  संजय सोनवणे पूर्ण नाव माहित नाही  रा हिंगणगाव ता इंदापूर जि  पणे व 10 ते 12 अनोळखी इसम नाव पत्ता माहित नाही  *▶️गु.घ.ता.वेळ व ठिकाण*= दि19/05/2021रोजी09/45 वा चे सुमा हिंगणगाव गावच्या हद्दीत पुणे सोलापूर हायवे रोडवर ता इंदापूर  ➡️ *सारांश* -  वर नमूद केले तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपी मजकूर यांनी राष्ट्रीय महामार्ग पुणे सोलापूर हायवे रोडवर इसम नामें संजय सोनवणे व इतर 10 ते 12 लोक अनधिकृतपणे   पूर्ण संचार बंदीचा आदेश लागू असताना covid-19 च्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी सो यांचा आदेश असताना दुसऱ्याच्या जीवितास धोकादायक असलेल्या संसर्ग होऊ शकतो हे माहीत असताना...

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?

 निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ? कुठलेही सामाजिक कार्य हे निर्पेक्ष असले पाहिजे,त्यात कुठलाही स्वार्थ,जोर-जबरदस्ती किंवा मी म्हणेल तसेच न करता व वागता सामाजिक कार्य एक कार्यशिलतेने परीपूर्ण निस्पृह असले पाहिजे,जसे एखादे विशाल  वटवृक्ष असते,भर उन्हात त्याच्या सावलीखाली अनेक गरजवंत पशु,पक्षी,मानव येतात, बसतात,जरासा विसावा घेतात तथा उन कमी झाले अथवा मार्गस्थ होण्याची वेळ आल्यावर मार्गस्थही होतात,त्या बदल्यात त्या विशाल वटवृक्षास त्या सावली घेणाऱ्यांकडून काय अपेक्षा असते ? तसेच एक थंड पाण्याच्या विहिरीचेही असेच काही असते ज्यावेळी मानव,पशू,पक्षी यांना तहान लागते तेव्हाच ते या थंड पाण्याच्या विहिरीजवळ येतात आणि पाणी पेऊन आपली तहान भागवितात त्याबदल्यात ती विहिरी त्यांच्याकडून काय अपेक्षा  ठेवते ? असेच निस्पृह समाजसेवेचेही असते,ज्यावेळेस लोकांना तुमची गरज वाटते,आवश्यक्ता भासते त्यावेळी ते आपल्याकडे येतात, आवश्यकतेनुसार थांबतात आणि मार्गस्थही होतात,जसे विशाल वटवृक्षाकडे गार सावली असते,विहिरीकडे थंड पाणी असते त्याप्रमाणेच एका समाज सेवकाकडे निस्पृह समाजसेवा असते,कधी स्वत:हुन तर कधी ...

जेव्हा राजकीय विरोधक मदतीला येतो.सोशल मीडियावर व्हायरल

 आज संध्याकाळ आठ ची वेळ माझ्या भावाचा फोन आला आणि त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आल्याची बातमी मला सांगितली. ही वार्ता समजताच माझ्या पायाखालची वाळूच सरकली. काय करायचे काहीच समजेनासे झाले कोणाला फोन करावा त्यात भर म्हणून CT स्कॅन चा रिपोर्ट आला त्यात स्कोर १४ असल्यामुळे माझ्या घरचे जास्त घाबरले होते. त्याला तात्काळ बेड ची गरज होती. मग मी त्वरित पाटील साहेबांबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी काही केल्या संपर्क होऊ शकला नाही.नंतर पाटील साहेबांच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींबरोबर संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु माझा त्यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा माझ्या लक्षात आले मी इतकी वर्ष ज्या व्यक्ती बरोबर उभा राहिलो त्या व्यक्तीने माझ्यावर संकट आलेवर मला मदत केली नाही. नंतर मी नाईलाजस्तव  माझ्या मित्राच्या माध्यमातून आमदार दत्तामामा भरणे यांच्या PA शी संपर्क साधला. PA साहेबांनी त्वरित माझा कॉल मामांशी जोडून दिला. मामांनी माझी राजकीय पार्श्वभूमीवर माहिती असताना सुद्धा काही वेळातच आम्हाला बेड मिळवून दिला. तसे पाहता मी मामांचा विरोधक परंतु मामांनी माझ्या बाबतीत...

औषध विक्रेत्यांमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकेबाबत तीव्र असंतोष

 औषध विक्रेत्यांमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकेबाबत तीव्र असंतोष शिर्डी प्रतिनिधी : ( इंदापूरचा आवाज बातमी सेवा ) महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोविड -१९ च्या प्रादुर्भावाची पहिली लाट ओसरुन दुसऱ्या लाटेला आपण सर्वजण सामोरे जात आहोत. कोविड – १९ च्या महामारीत अग्रक्रमाने काम करणाऱ्याच्या यादीत कोविड योद्धा म्हणून औषधी विक्रेत्यांच्या सेवेकडे सरकारने संपूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे.लसीकरण कार्यक्रम सुरु झाला, औषधी विक्रेता व तेथील कर्मचारी हे आपल्या जीवावर उदार होऊन २४ तास सेवा देत आहेत व त्यामुळेच संपूर्ण देशासह महाराष्ट्रात औषधी पुरवठा सुरळीत राहण्यात मोठी मदत झालेली आहे. औषधी विक्रेत्यांचा प्रत्यक्ष संबंध हा कोविड पेशंट अथवा त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाइकांशी जवळून येतो व त्यात त्याच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रासह देशात २०० पेक्षा अधिक औषध विक्रेते कोविड – १९ चे बळी पडले असून, १००० च्या जवळपास परिवारातील त्यांचे नातेवाईक बाधित झालेले आहेत. असे असूनही केंद्र वा राज्य सरकारने कोविड योद्धा म्हणून सन्मान तर दिला नाहीच परंतु साध...

प्रवरा कोविड सेंटरला दानशूरांची मदत

 प्रवरा कोविड सेंटरला दानशूरांची मदत शिर्डी प्रतिनिधी :( इंदापूरचा आवाज बातमी सेवा ) प्रवरा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या मदतीकरीता साखर कामगार सभा शाखा प्रवरा नगर आणि कामगार युनियनच्या वतीने २ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुपूर्त केला. याप्रसंगी कामगार युनियन चे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर, कामगार सोसायटीचे अध्यक्ष निवृती तांबे, कामगार संचालक पोपट वाणी, दिलीप कडू आदी उपस्थित होते. शिर्डी येथील साईश विनोद गोंदकर यांनी नीड फाॅर निधीच्या माध्यमातून कोव्हीड सेंटर करीता औषधांची उपलब्धता करुन दिली. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यानी ५० हजार रुपयांचा धनादेश आ.विखे यांच्याकडे दिला. लोणी येथील मराठा उद्योजक लॉबी प्रवरा परीसराच्या वतीने ७१ हजार आणि दिपक रोहोम यांनी ५१ हजार रुपयांची मदत कोव्हीड सेंटर करीता दिली आहे. सदर रुग्णालयाला विविध क्षेत्रांतून मदतीचा ओघ हा सातत्याने सुरूच असून लवकरच येथील रुग्ण कोरोनावर मात करण्यात यशस्वी होतील असे चित्र सध्या रुग्णालयात पाहायला मिळत आहे. याप्रसंगी शिर्डी नगरपंचायत चे नगराध्यक्ष शिवा...

रत्नाकर मखरे गोरगरीबांचे अश्रू पुसणारे समाजसेवक होते :- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

  रत्नाकर मखरे गोरगरीबांचे अश्रू पुसणारे समाजसेवक होते :- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील रत्नाकर मखरे शोषितांचा व वंचितांचा आधारवड होते - राज्यमंत्री ना.दत्तात्रय भरणे इंदापूर  :-:(दि.१६) इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर मल्हारी मखरे यांचे (दि.१४)  दुःखद निधन झाले.त्यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम संस्थेच्या भिमाई आश्रम शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.    तात्यांचे थोरले सुपुत्र ॲड. राहूल मखरे यांनी तथागत भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व वडील कालकथित रत्नाकर मखरे तात्या यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तदनंतर बौध्दाचार्य मा.बाळासाहेब धावारे ( राज्य उपाध्यक्ष, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क महाराष्ट्र) यांनी बौध्द धर्मानुसार विधिवत पूजा केली, उपस्थितांनी दोन मिनिट स्तब्ध उभे राहून तात्यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रत्नाकर मखरे तात्यांच्या प्रती भावना व्यक्त करत  श्रद्धांजली वाहिली. यावेळी राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हण...

टीम कोविड केअर श्रीरामपूर च्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयात खाजगी स्वच्छता कर्मचाऱ्याची नेमणूक

  टीम कोविड केअर श्रीरामपूर च्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयात खाजगी स्वच्छता कर्मचाऱ्याची नेमणूक ....  कोरोना काळामध्ये टीम कोविड केअर विविध उपक्रमांतर्गत उल्लेखनीय सामाजिक कार्य करत आहे. याचाच एक भाग म्हणून टीमचे सदस्य ग्रामीण रुग्णालयात गेले असता प्रभारी वैद्यकीय अधीक्षक- डॉ.योगेश बंड, डॉ.तौफिक शेख,डॉ.मुकुंद शिंदे, डॉ.शेवंते व त्यांचे अन्य सर्व सहकारी यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्याबळामुळे रूग्णालयातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असल्याचे लक्षात आले. वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होत असल्याचे निदर्शनास आले.  ही गोष्ट लक्षात घेऊन टीम कोविड केअरने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीने दिनांक 1 मे 2021रोजी कामगार दिनाचे औचित्य साधून स्वखर्चाने मानधन तत्त्वावर एका गरजू स्वच्छता कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे. सदर कर्मचारी दररोज रुग्णालयात जाऊन स्वच्छतेची कामे पार पाडत आहे.  टीमच्या या कामाबद्दल टीमचे सदस्य ऍड.समीन बागवान, कॉ. जीवन सुरुडे,शरी...

काँग्रेस मधील ओबीसींचा कोहिनुर हिरा निखळला!- महादेव जानकर.

काँग्रेस मधील ओबीसींचा कोहिनुर हिरा निखळला!- महादेव जानकर.  *मुंबई-:*  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधील ओबीसींचे युवा नेते राज्यसभेचे खासदार श्री.राजीव सातव यांचं आज दिनांक-16 मे 2021 रोजी दुःखद निधन झालं. राजीव सातव यांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पित करतो, काँग्रेस मधील युवकांचा कोहिनुर हिरा निखळला आहे, असा शाेक महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे.  काेविडच्या महामारीमुळे ऐन तारुण्यातील खासदार,अत्यंत कमी वयात राजीव सातव यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते  हिंगोलीचे खासदार हाेण्यापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. सध्या ते राज्यसभेचे सदस्य हाेते. अखिल भारतीय युवक काॅंग्रेसमध्ये काम करत असताना त्यानी ओबीसींना या पक्षात जास्तीतजास्त काम करण्याची संधी कशी देता येईल यावर भर देत असत, प्रत्येक योग्य संधीचे त्यांनी साेने केले. स्वभाविकपणे देशातील युवकांचा तरुण नेता, पक्षाचा हाेतकरु व प्रामाणिक नेता म्हणून त्यांची ख्याती होती. राहुल गांधी यांचे विश्वासु म्हणून त्याना अनेक राज्यांची जबाबदारी दिली होती आणि ते ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडत हाेते, युवक...

साईबाबा हॉस्पिटल मधील गलथान कारभार चव्हाट्यावर आणल्याने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे

 साईबाबा हॉस्पिटल मधील गलथान कारभार चव्हाट्यावर आणल्याने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे श्वास घ्यायला त्रास होत असल्याचा फोन मला माझ्या नातेवाईकांनी केला.त्यामुळे तातडीने आहे तसाच हॉस्पिटल मध्ये गेलो.तिथली अवस्था आणि व्यवस्था अंगाला घाम फोडणारी होती.याकडे कार्यकारी अधिकारी यांचं लक्ष वेधलं,त्यांच्या चुकांवर बोट ठेवलं.कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या नाकर्तेपणामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणलेला गलथान कारभार यामुळे विचलित होऊन राग मनात धरून त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. यापुर्वी साई संस्थानच्या कोविड सेंटरची मंत्री,खासदार,आमदार अनेक अधिकारी यांनी पाहनी केली,दक्षिण नगरचे खासदार यांनी कोविड सेंटरला गुढी उभारून कोरोना रुग्णांना पी.पी.ई किट न घालता पुरणपोळीचे जेवण वाढले.सर्वच रुग्णांचे नातेवाईक पी.पी.ई किट शिवाय तेथे राहतात,त्यांच्यावर कान्हूराज बगाटे गुन्हे दाखल करणार का? स्वतः कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी पी.पी.ई किट न घालता पाहणी केली. त्यांच्यासाठी कायदा नाही का?मग त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला पाहिजे.कार्यकारी अधिकारी बगाटे यांच्या...

प्रिंट व डिजिटल माध्यमांची अभिनव संकल्पना मिडिया प्लस ऍड एजन्सी तसेच न्यूज ब्युरो चे गोरेगावात उदघाटन

प्रिंट व डिजिटल माध्यमांची अभिनव संकल्पना मिडिया प्लस ऍड एजन्सी तसेच न्यूज ब्युरो चे गोरेगावात उदघाटन विशेष प्रतिनिधी मुंबई उपनगरातील गोरेगाव विभागात डिजिटल तसेच प्रिंट माध्यमांनी मिळून पहिल्यांदाच एका अभिनव कल्पनेनं "मिडिया प्लस ऍड एजन्सी तसेच न्यूज ब्युरो" च्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन लोकसेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष दीपक सूर्यकांत जाधव यांच्या हस्ते दिनांक १४ मे २०२१ रोजी अक्षय तृतीया च्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं दिलेल्या नियमांचे पालन करत अगदी मोजके पत्रकार तसेच समाजसेवकांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण शारीरिक सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस रवि गुप्ता यांच्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जोगेश्वरी पूर्व चे विभाग अध्यक्ष बाबुभाई पिल्ले यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली. मिडिया प्लस ऍड एजन्सी तसेच न्यूज ब्युरो चे मुख्य संचालक हे मराठी दैनिक वृत्तमानस चे पत्रकार दत्तात्रय जाधव, केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. चे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच इंडिया २४ तास या  मराठी वृत्तवाहिनीचे मु...

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने उमेश चव्हाण यांचा सत्कार

 छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने उमेश चव्हाण यांचा सत्कार पुणे - राज्याच्या कानाकोपऱ्यात कौतुकाचा विषय ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलची निर्मिती करणाऱ्या उमेश चव्हाण यांचा पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटना विश्रांतवाडी विभागाच्या वतीने आज पहाटे सत्कार करण्यात आला. उमेश चव्हाण हे रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष असून या संघटनेच्या वतीने रुग्णांचे हक्क आणि अधिकारांची मोठी चळवळ त्यांनी गेल्या काही वर्षात उभी केली आहे.           सध्याच्या परिस्थितीत पॉझिटिव्ह रुग्णाला साधा बेड तर नाहीच, ऑक्सिजनचा बेडही मिळत नसताना केवळ ईच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी त्रेपन्न बेडचे छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल अवघ्या आठ दिवसात उभे केले. करोडो रुपयांची संपत्ती असणारे आमदार- नगरसेवक यांना हॉस्पिटल उभे करता येऊ शकले नाही, तिथे उमेश चव्हाण यांनी केलेल्या कृतीचे पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाने स्वागत केले.      एक सर्वसामान्य व्यक्तीने आपल्या मित्र परिवाराच्या मदतीने तर प्रसंगी आईचे आणि पत्नीचे सोने गह...

आंबेडकर चळवळीचा सेनापती , संविधान रक्षक , हरपला , - प्रकाश पवार विचारमंथन ग्रुप

  आंबेडकर चळवळीचा सेनापती , संविधान रक्षक , हरपला  ,  - प्रकाश पवार विचारमंथन ग्रुप  इंदापुर शहराचे माजी नगराध्यक्ष  रत्नाकर मखरे यांची निधन (इंदापूर प्रतिनिधी ) इंदापूर शहरातील सामाजिक व राजकीय पटलावरती तात्या नावांने परिचित असलेले रत्नाकर मखरे हे नांव इंदापूर तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्र राज्य तील आंबेडकर चळवळीचे सैनिक म्हणून कोरले गेलेले असून  ते नांव तमाम महाराष्ट्र राज्य तील  जनतेला कायम आठवणीत राहील.              तात्यांनी इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.महाराष्ट्र शासनाने त्यांंना दलित मित्र पुरस्काराने सन्मानित केले होते. रत्नाकर मखरे या नावांने अनेक आंदोलने व उपोषण  गाजली.अनेक गरीब पिडीत न्याग्रस्त नागरिकांना त्यांनी न्याय मिळवून दिला.     आन्यावर प्रहार करणारे तात्या न्याय मिळे पर्यंत मागे हटत नसत.तात्यांची काही आंदोलने अंदाजे 1 ते 2 वर्षे पर्यंत चालली.  एक चालते फिरते  भारतीय राज्य घटना पाठ असणारे व्यक्ती होते.  तात्या धर्म निरपेक्षपणे काम करत असताना त्...

ईद उत्साहाने साजरी करा पण घरात राहू अंजुम इनामदार

  ईद उत्साहाने साजरी करा पण घरात राहू मुस्लिम बांधवांचा अति महत्त्वाचा मानला जाणारा रमजान ईद ईद-उल-फित्र दिनांक 14/5/2021 रोजी होणार आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजा ठेवतात व संपूर्ण महिना रोजा ठेवला नंतर ईद साजरी करतात. दिनांक 14 मे 2021 रोजी होणाऱ्या या ईदच्या दिवशी तमाम मुस्लिम बांधवांना कडकडाची हात जोडून विनंती मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या वतीने करण्यात येते की. पुणे शहरातील कोरोना या आजाराची परिस्थिती खूप गंभीर आहे. दररोज कोरोना या आजाराचे साधारण तीन हजार पेक्षा अधिक रुग्ण पुण्यात आढळून येत आहे.दररोज मरणार्‍या लोकांची संख्या ससून हॉस्पिटल वगळता साधारण 80 पेक्षा जास्त आहे व क्रिटिकल असलेल्या लोकांची संख्या साधारण चौदाशे पेक्षा जास्त आहे. आजही पुण्यात अनेक हॉस्पिटल्समध्ये बेड उपलब्ध नाही ऑक्सिजनची कमी आहे रेमडेसिविर इंजेक्शन ची मागणी मोठ्या प्रमाणात लोक करतात व प्लाजमा साठी विविध हॉस्पिटल व ल्याबमध्ये चक्कर मारत आहे .असे भयंकर चित्र पुण्यामध्ये निर्माण असताना मुस्लिम समाजाचा महत्त्वाचा असणारा ईद-उल-फित्र रमजान ईद आली आहे. सर्व मुस्लिम बांधवांनी समझ...

लोकमत परिवारातील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देण्याचा निर्णय कौतुकास्पद आणि दिलासा देणारा - प्रकाश कुलथे

 लोकमत परिवारातील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देण्याचा निर्णय कौतुकास्पद आणि  दिलासा देणारा - प्रकाश कुलथे श्रीरामपूर- लोकमत परिवारातील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रूपये देण्याचा लोकमत व्यवस्थापनाने घेतलेला निर्णय दिलासा देणारा आहे.राज्यातील अनेक पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ज्येष्ठ व नवोदित पत्रकार भीतीच्या छायेत काम करत आहेत. जोखीम पत्करून  पत्रकार फिल्डवर काम करत आहेत, त्यातील अनेकांना त्यांच्या कंपन्यांचे कोणतेही सुरक्षा कवच नाही. त्यामुळे दुर्दैवाने जर काही अनुचित प्रकार घडला तर पत्रकारांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर येते. अशा वेळी लोकमत समूहाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. यामुळे पत्रकारांना निश्चितच काम करण्यास अधिक बळ मिळेल. वृत्तपत्र अडचणीच्या काळात आपल्याला वाऱ्यावर सोडत नाही ही भावना सकारात्मक परिणाम घडवून आणणारी आहे. कोरोना संकट व लॉकडाऊनमुळे जाहिरात व्यवसाय आटलेला आहे. अनेक आव्हानांना वृत्तपत्रांना सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी लोकमतने आपल्या दिवंगत पत्रकारांना 10 लाख रुपयांपर्यंतची मदत करण्याचा घेतलेला निर्णय अति...

स्वस्त धन्य दुकानचे पाठिराखे के कोण ? भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ?

 स्वस्त धन्य दुकानचे पाठिराखे  के कोण ? भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ?  इंदापुर तालुका स्वस्त धान्य दुकान की खाजगी स्वस्त धन्य दुकान  ?  (इंदापूर प्रतिनिधी )इंदापुर तहसील कार्यालयतील पुरवठा शाखा अधिकारी  इंदापूर तालुक्यातील स्वतः धान्य दुकान दार यांचे लाड करता ना दिसत आहे.इंदापूर स्वतः धान्य दुकान दार यांना आलेल्या तक्रारी सांगत असून इंदापुर तालुकातील किती स्वस्त धान्य दुकानावर आलेल्या तक्रारी वर इंदापुर तहसील कार्यालय ने  कारवाई केली या बाबतचे उत्तर  नागरिका मधून विचारले जात आहे. इंदापुर तहसील कार्यालयतील पुरवठा शाखेतील रेशन कार्ड ऑनलाइन करणे साठी 200 रूपयाची लाच घेतली   जात असून या प्रकरणी इंदापुर तालुका पुरवठा अधिकारी माननीय श्री अनगरे साहेब  यांची याबाबत आपली प्रतिक्रिया काय ? आपण यावर काय कारवाई करणार अशी विचारणा केली असता प्रतिक्रिया देण्यास नकार देवून मोठ्या साहेब यांची प्रतिक्रिया घेणेस सांगितले.यावरून असे दिसून येत आह की, लाच प्रकरणी ते गंभीर नसून एक प्रकारे पाठीशी घालत असल्याचे बोलले जात आहे.या प्रकरणी काही दिवसांपूर्वी प...

रेकॉर्डवरील सराईत आरोपी चोरीच्या 5 लाखाच्या वाहनासह अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.

 प्रतिनिधी अहमदनगर- कामरगाव येथे अपघातात दोन व्यक्ती मयत झाल्या, यास जबाबदार असणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपी चोरीच्या 5 लाखाच्या वाहनासह अटक करण्यात अहमदनगर नगर तालुका पोलीसांना यश आले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. 9 मे 2021 रोजी नगर तालुका पो.स्टे 1 गुरनं. 233 / 2021 भादवि कलम 304(अ), 279,337,338,427 मो.वा.का.क. 184,134(अ) (ब) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी व नगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.न. 216/2021 भा.द.वि.क.357,480 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी उमेश उर्फ ओंकार मधुकर शिंदे (रा. पिंपरी आंतरवन जि. बीड) नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधे त्याचे ताब्यातील चोरीचे वाहन ( क्र. MH 12 HN 8462) हे रस्त्याने भरधाव वेगात हयगयीने चालवून दोन व्यक्तींचा अपघात करुन त्यांचे मृत्युस कारणीभूत होऊन वाहनाचे नुकसानीस कारणीभूत झाला. सदरचा गुन्हा करुन तो आरोपी वाहनासह फरार झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रावाल, नगर ग्रामीण उपविभागिय पोलीस अधीकारी अजित पाटोल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होता.     गुन्हयाच्या तपासादरम्यान मिळा...

तलाठी सहा हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

 कवठेमहांकाळ प्तालुक्यातील तिसंगी येथील तलाठी रामू पांडुरंग कोरे (वय 43) सहा हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या आजोबांनी तक्रारदार व त्यांची आई यांच्या नावाने केलेल्या बक्षीसपत्राची हक्क-अधिकार पत्रकात नोंद धरण्यासाठी तिसंगी येथील तलाठ्याने तक्रारदाराकडे नऊ हजार रुपयांची लाच मागणी केली असल्याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे दिली होती. काल ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी करून तलाठी कोरे यांनी तक्रारदाराकडे चर्चेअंती सहा हजार रुपये लाचेची मागणी करून आज दिनांक ११ रोजी लाच रक्कम घेऊन येण्यास सांगितले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तलाठी कार्यालय तिसंगी येथे सापळा लावण्यात आला. तलाठी कोरे याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी करून तक्रारदाराकडून सहा हजार रुपये लाच स्वीकारली असताना रंगेहाथ पकडण्यात आले.कवठेमहंकाळ पोलीस ठाण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू झाली. लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे,अप्पर पोलीस उपायु...

श्रीमंत कोकाटे यांच्या वाँलवरून कोणी धर्मद्रोही म्हणालात तरी चालेल, पण कोरोनावर मात करण्यासाठी हा लेख आवर्जून वाचा*

 *कोणी धर्मद्रोही म्हणालात तरी चालेल, पण कोरोनावर मात करण्यासाठी हा लेख आवर्जून वाचा* *मांसाहार का महत्वाचा आहे ?*                               "आज आमचा उपवास आहे,त्यामुळे आज आम्ही फराळ करणार आणि फराळासाठी शाबुदाणा,चीप्स (बटाटे),रताळे,शेंगदाणे,खजूर,भगर इत्यादी पदार्थच खाणार.आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत.मांसाहार करणारांकडे आम्ही पाणीही पीत नसतो.आमच्या सोसायटीत फक्त शाकाहारी लोकच राहतात,मांसाहारी कुटुंबाला आम्ही फ्लॅटही देत नाही.शाकाहारी लोक सात्विक,सोज्वळ, सुसंस्कृत,हुशार असतात.मांसाहारी लोक उग्र,तामसी,रानटी,मंद असतात."                                 शाकाहाराचे समर्थन करणारे आणि मांसाहाराला तुच्छ लेखणारे लोक साधारणपणे अशा पद्धतीने सातत्याने बोलत असतात. कोणी कोणता आहार घ्यावा, आपण शाकाहारी, मिश्राहारी की मांसाहारी असावे, हे प्रत्येक व्यक्तीचे घटनात्मक स्वातंत्र्य आहे. संवैधानिक लोकशाहीमध्ये तर त्या स्वातंत्र्याचा आदरच केलेला आहे . ए...

साहित्य प्रबोधन मंचतर्फे राज्यस्तरीय विनोदी कथा लेखन स्पर्धेचे आयोजन - स्वामीराज कुलथे

  साहित्य प्रबोधन मंचतर्फे राज्यस्तरीय विनोदी कथा लेखन स्पर्धेचे आयोजन - स्वामीराज कुलथे  श्रीरामपूर(प्रतिनिधी)- येथील साहित्य प्रबोधन मंचतर्फे विनोदी कथा लेखन स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती मंचचे कार्याध्यक्ष स्वामीराज प्रकाश कुलथे यांनी केले.      साहित्य प्रबोधन मंचचे अध्यक्ष डॉ. शिवाजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली.त्यामध्ये कार्याध्यक्ष स्वामीराज कुलथे यांनी सांगितले की आजच्या काळात कथालेखनासाठी अनेक विषय आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना विविध अनुभव येतात अशा वातावरणावर किंवा विविध जीवन दर्शनावर आधारित विनोदी कथा वाचकांना एक आनंदपर्वणी वाटेल. अशा कथा स्पर्धेचे महत्व त्यांनी विशद केले. आणि साहित्य प्रबोधन मंचच्यावतीने आयोजित या स्पर्धेचे राज्यस्तरीय नियोजन केले असून राज्यातील जास्तीत जास्त लेखकांनी यात सहभाग घ्यावा, असे स्वामीराज कुलथे यांनी सांगितले.  या यावेळी मंचचे संस्थापक डॉ. बाबुराव उपाध्ये, मार्गदर्शक माजी प्राचार्य टी. ई. शेळके, पत्रकार प्रकाश कुलथे, स्नेहप्रकाश प्रकाशनच्या प्रमुख सौ. स्नेहलता कुलथे, सौ. मंदाकिन...